ऑनलाईन टीम / यवतमाळ:
यवतमाळ जिल्ह्यात रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसात वीज पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील गुजरी येथील शिवारात आज सकाळी ही घटना उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी यवतमाळ जिल्ह्यातील अनेक भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. त्यावेळी राळेगावतील गुजरी शिवारात मागील चार दिवसांपासून गाई चारण्यासाठी आलेल्या निमगव्हान येथील सहा जणांचा वीज पडून मृत्यू झाला. यामध्ये चार पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. मृतांकडे 50 गाई होत्या. त्या सर्व गाई सुरक्षित आहेत. मृतांची नावे अद्याप समजू शकली नाहीत.