ग्राम पंचायतीच्या माध्यमातून ग्रामस्थांना डस्टबिन वितरण
प्रतिनिधी / येळ्ळूर
स्वच्छ भारत अभियानांतर्गत येळ्ळूरमधील कचऱयाचा संग्रह करण्यात येणार आहे. घंटागाडीच्या माध्यमातून हा कचरा गोळा केला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक कुटुंबाला डस्टबिनचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचे उद्घाटन नुकतेच ग्राम पंचायतच्या माध्यमातून करण्यात आले.
ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे डस्टबिनमध्ये ठेवून तो घंटागाडीकडे सोपवावा लागणार आहे. त्यासाठी सर्वच कुटुंबांना डस्टबिन देण्यात येणार आहेत. हा सर्व कचरा ग्राम पंचायतीच्या माध्यमातून एका गायरानाच्या खुल्या जागेमध्ये जमा करून त्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे.
शहराबरोबरच ग्रामीण भागात कचऱयाची समस्या निर्माण होते. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागामध्येही आता कचऱयाचा संग्रह करण्यात येणार आहे. ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, पीडीओ अरुण नाईक, सेपेटरी मराठे, ग्राम पंचायत उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर, सदस्य रमेश मेणसे, प्रमोद पाटील, दयानंद उघाडे, अरविंद पाटील, विलास बेडरे, जोतिबा चौगुले, राजू डोणेण्णावर, सुनील अरळीकट्टी, राजकुंवर पावले, रूपा पुणेण्णावर, शांता काकतकर, शांता मासेकर, सुवर्णा बिजगरकर, मनीषा घाडी, रुक्मिणी नाईक, शालन पाटील, वनिता परीट, कल्लाप्पा मेलगे आदी उपस्थित होते.