शेतकरी घाईगडबडीत : सुगी हंगाम साधण्यासाठी धडपड ; मजुरांचा तुटवडा भासत असल्याने मोठय़ाप्रमाणात गैरसोय
प्रतिनिधी /येळ्ळूर
येळ्ळूर शिवरात भात कापणी जवळपास 50 टक्क्मयांपेक्षाही अधिक झाली आहे. भात कापणीबरोबरच मळणी कामही जोमात सुरू आहे. एकाचवेळी सर्व कामे करण्यामध्ये शेतकरी गुंतला असून आता मळणी झाल्यानंतर कडधान्य पेरणीकडेही शेतकऱयांना वळावे लागणार आहे. मजूर मिळत नसल्यामुळे अनेकांना समस्या निर्माण होत आहे. मात्र सर्व कुटुंबीय मिळूनच ही कामे करताना दिसत आहेत.
येळ्ळूर परिसरामध्ये भात हेच मुख्य पीक आहे. भातकापणी झाल्यानंतर कडधान्य पेरणी केली जाते. भातकापणी जवळपास 15 दिवसांपासून सुरू आहे. यावषी पावसामुळे कापणीला उशीराने सुरूवात झाली. भातावर मावा व करपा रोग पडल्याने भातपीक खराब झाले आहे. याचबरोबर पावसामुळे पीक आडवे झाले आहे. त्यामुळे भातकापणी करताना अवघड जात आहे. एकरी 10 ते 12 माणसे भात कापत होती. मात्र आता एकरी 20 माणसे लागत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
भात कापणीनंतर तातडीने मळणी केली तर रब्बी पेरणी करणेही सोपे जाणार आहे. त्यामुळे बरेच शेतकरी भात कापणीनंतर थेट मळणी करू लागले आहेत. पूर्वी खळे करून मळणी केली जात होती. मात्र खळय़ाच्या ठिकाणी ताडपत्री आल्या आहेत. तर बैलांच्या ठिकाणी ट्रक्टर आले आहे. वारे देण्यासाठी यंत्र आले आहे. त्यामुळे मळणी करणे सोपे झाले आहे. असे असले तरी मळणी करण्यासाठी देखील मजुरांची गरज असते. मात्र मजूर मिळणे कठीण झाले आहे.
पूर्वी रात्रीच्यावेळी मळणी पुरूष मंडळी करत होते. मात्र आता दिवसभरच महिला मजुरांना घेऊन मळणी केली जात आहे. एकूणच शेती करण्यामध्ये अमुलाग्र बदल झाला आहे. असे असले तरी उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ बसेनासा झाले आहे. येळ्ळूर शिवारामध्ये बासमती, इंद्रायणी, सोनमसह इतर जातींची भाते मोठय़ा प्रमाणात घेतली जातात. पावसामुळे यावषी पिकाला फटका बसला आहे. तरी देखील शेतकरी आता भातकापणी जोमाने करत आहे. येत्या आठ दिवसांत भातकापणी पूर्ण होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. भात कापणीनंतर तातडीने मळणी केली जात आहे.
पाणथळ शिवारात रब्बी पेरणी करणे अशक्य
सध्या जमिनीमध्ये अधिक ओलावा असल्यामुळे पाणथळ जागेतील शिवारामध्ये रब्बी पेरणी करणे अशक्मय झाले आहे. मात्र माळवट जमिनीमधील ओलावा कमी झाल्याने त्या ठिकाणी रब्बी पेरणी कामालाही काही शेतकऱयांनी सुरूवात केली आहे. मागील वषी संपूर्ण कडधान्य खराब झाले होते. त्यामुळे आता शेतकऱयांना अधिक दराने मसूर, वाटाणा, गहू, जोंधळा खरेदी करावा लागत आहे. पेरणीसाठी मसूर अधिक लागतो. त्यामुळे बरेच शेतकरी मसूर ऐवजी जोंधळा व इतर पिकांकडे भर देताना दिसत आहेत. एकूणच येळ्ळूर परिसरातील बळीराजा मोठय़ा जोमाने कामाला लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे.