रत्नागिरी नगर परिषदेची अतिक्रमण हटाव धडक मोहीम
कारवाईच्या भीतीने अनेकांनी स्वतहून अतिकमणे दूर केली
प्रतिनिधी / रत्नागिरी
शहरात वाढलेल्या अनधिकृत टपऱ्या, बांधकामे व फुटपाथवरील विकेत्यांच्या गर्दीमुळे झालेल्या अतिकमणांवर नगर परिषदेने कारवाईचा बडगा उगारला. या अतिकमणांवर मंगळवारी बुलडोझर फिरवण्याबरोबरच ती हटवण्याची जोरदार मोहीम राबवण्यात आली. कारवाईच्या भीतीने आदल्यादिवशीच अनेकांनी स्वतहून टपऱ्या, खोके हटवले. मात्र ठाण मांडून राहिलेल्या टपऱ्या, खोके, फळविकेते, भाजीविकेते यांना हटवून झालेल्या साफसफाईमुळे रस्त्यांनाही मोकळे स्वरूप आले.
शहरातील रस्त्यांकडेला असलेल्या फुटपाथ व रस्त्यांत रहदारीस अडथळा होईल, अशापकारे ही अतिक्रमणे फोफावली होती. ही गर्दी हटवण्यासाठी नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेत निर्णय घेत खास मोहीम हाती घेण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे रस्ते आणि फुटपाथ मोकळा होण्याकडे लक्ष वेधले होते. रत्नागिरी शहराचे प्रवेशद्वार असलेल्या साळवी स्टॉप येथूनच अनधिकृत बांधकामाचे साम्राज्य उभे राहिले होते. शहरातील प्रत्येक वॉर्डात अनधिकृत टपऱ्या व खोक्यांची संख्या वाढली होती. टपऱ्यांमुळे शहरातील रस्त्यांना बकालतेचे स्वरूप आले आहे.
रस्त्यावरील फुटपाथवर असणारी अतिक्रमणे, टपऱ्या हटवण्यासाठी नगरपरिषद सज्ज झाली होती. या अनधिकृत खोके, टपऱ्या व अतिक्रमण करणाऱयांवर नगरपरिषदेने मंगळवारी सकाळपासून कारवाईला प्रारंभ केला. नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई हाती घेण्यात आली. नगरपरिषदेने अतिक्रमणे हटवण्याबाबत 2 दिवस लाऊडस्पीकर लावून रिक्षा फिरवल्याने अनेकांनी स्वत:हून अतिक्रमणे तात्पुरत्या स्वरूपात काढल्याचे दिसून आले. मारुती मंदिर येथून खोके हटवण्यास सुरुवात झाली. यासाठी जेसीबी, इतर गाड्यांचा वापर करण्यात आला. अतिक्रमणे हटवण्याची ही मोहीम अशीच सुरू राहिल, असे रत्नागिरी नगर परिषदेचे आरोग्य सभापती राजन शेट्ये यांनी सांगितले.