प्रतिनिधी / रत्नागिरी
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आज १२ रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८ हजार १७८वर पोहोचली आहे. आज ८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७ हजार ३८४ झाली आहे. रुग्ण बरे झाल्याची टक्केवारी ९०.२९ आहे.
आज रत्नागिरी, आणि राजापूर येथील प्रत्येकी १ अशा २ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींची संख्या ३०२वर पोहोचली आहे. मृतांची टक्केवारी ३.६९ टक्के इतकी आहे, अशी माहिती जिल्हा कोविड रुग्णालयातून आज शुक्रवारी (दि. १६) ही माहिती देण्यात आली. तपशील पुढीलप्रमाणे
आरटीपीसीआर
चिपळूण ६
रत्नागिरी १
एकूण ७
रॅपिड ॲंटिजेन टेस्ट
दापोली १
लांजा २
रत्नागिरी २
एकूण ५