ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती समोर आली आहे. लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाकडून ही कारवाई सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी राजौरी जिह्यातील बरोत गावातील डोंगराळ भागात दहशतवादी लपल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली होती. त्याआधारे सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने या भागाला वेढा घालून शोध मोहीम सुरू केली. दरम्यान, सुरक्षा दलांच्या वेढय़ात अडकलेल्या दोन दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. जवानांनी दहशतवाद्यांना शरण येण्याची संधी दिली. पण दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरूच ठेवला. सुरक्षा दलांकडून या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.