केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे स्पष्टीकरण : दरदिवशी 60 किलोमीटर
वृत्तसंस्था/ मुंबई
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशातील उद्योगधंदे ठप्प आहेत. त्यामुळे यातील शक्मय असणाऱया उद्योगाचे कामकाज सुरु करण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येत आहे. यातील सर्वात महत्वाचे काम म्हणजे रस्ते निर्मितीचे होय. यातील राज्यमार्ग निर्मितीची गती प्रतिदिन 60 किलोमीटर पर्यंत करण्याची योजना तयार करण्यात येणार येत असल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे. म्हणजेच सध्याच्या तुलनेत यात वाढ करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. मार्ग विकासाचा वेग दुप्पटीने वाढवला आहे.
अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी निवडक उद्योगांना चालना देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे. ते पेडाई व एमसीएचईच्या सदस्यांसोबत व्हिडीओ परिषदेत बोलत होते. पहिल्यांदा आम्ही 30 किलोमीटर इतक्मया राज्यमार्गाची निर्मिती करण्याचे ध्येय निश्चित केले होते. परंतु आता बंद असल्यामुळे हे ध्येय प्रतिदिन 60 किलोमीटर करण्याचे आमचे नियोजन असल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे
.म्हणजे एकूण रस्ते बांधणीचे काम 2 पट वेगाने करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.