बेंगळूर : लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून आमदार रमेश जारकीहोळी आणि मुनीरत्न हे मंत्री होणार आहेत, अशी प्रतिक्रिया युवजन आणि क्रीडा खात्याचे मंत्री नारायणगौडा यांनी दिली आहे. रमेश जारकीहोळी यांनी मंगळवारी नवी दिल्लीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून चर्चा केली होती. याच दरम्यान मंत्री नारायणगौडा यांनी हे विधान केल्यामुळे राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.बेंगळूर येथे बोलताना नारायण गौडा म्हणाले, रमेश जारकीहोळी यांच्याविषयी आपल्याला आदर आहे. आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखालीच होणार आहे. राज्यात नेतृत्व बदलाची चर्चा ही केवळ अफवा आहे, असेही नारायण गौडा म्हणाले.
Previous Article7 आयएएस अधिकाऱयांच्या बदल्या
Next Article राज्यात भाजपला पुन्हा सत्तेवर आणण्याचा संकल्प
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.