भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा, टोला कलाकारांना जगविण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची
प्रतिनिधी / कोल्हापूर
गेल्या पावणे दोन वर्षापासून कोरोनामुळे नाटÎगृह, चित्रपटगृह, चित्रीकरण बंद असल्याने कलाकारांसह या व्यवसायात असणाऱया इतर घटकांवरही उपासमारीची वेळ आली आहे. नाटÎगृह सुरू करा, या मागणीसाठी रंगकर्मींनी अनेक आंदोलने केली तरी आंधळे आणि बहिरे असलेल्या राज्य सरकारला कलाकारांचे दु:ख समजत नाही, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले. अडचणीत असलेल्या कलाकारांना जगविण्याची जबाबदारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची आहे, ती त्यांना टाळता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर रंगकर्मी कलाबाजार अंतर्गत रंगकर्मींनी मिरजकर तिकटी येथे गोंधळी गीतासह इतर गाण्यांवर नृत्य सादर करून राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी भेट देवून कलाकारांना पाठींबा देत, सरकारवर निशाना साधला. राष्ट्रवादीचे जयकुमार शिंदे, सामाजिक कार्यकर्ते बाबा पार्टे, तृतीयपंथीय संघटनांचे कार्यकर्ते यांनी आंदोलनाला पाठींबा दिला.
भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, कोरोनाच्या कालावधीत सरकारने समाजातील कामगार, कलाकार, फळ, भाजी विक्रेते आदी 30 घटकांना कोणतीही आर्थिक मदत केलेली नाही. नाटÎगृह बंद असल्याने कलाकार दोन वेळच्या जेवणाला महाग झाले आहे. गेल्या दोन महिन्यापासून आंदोलनाच्या माध्यमातून ते विनवणी करीत आहेत. तरीही सरकारला जाग येत नाही.
आंदोलनात कलाकारांनी अंबाबाईचा गोंधळ घालत नाटÎगृहाचे दार उघडण्यासाठी प्रार्थना केली. सागर बगाडे, श्रध्दा शुक्ला यांच्यासह सर्वच कलाकारांनी अंबाबाई व गणराजाला नाटÎगृह सुरू करण्याची सुबुध्दी सरकारला दे, असे साकडे घातले. संभाजीनगर येथील नवसाच्या गणपतीला नाटÎगृह सुरू करण्यासाठी नवस बोलत गजनृत्य सादर केले. यावेळी सुरज नाईक, दिनेश माळी, प्रसाद जमदग्नी, मंजिरी देवण्णावर, सुनील घोरपडे, रोहन घोरपडे, मनोज जोशी, धनंजय पाटील आदी उपस्थित होते.