वनांमध्ये मिळणाऱया फळांचे तसेच मुळय़ांचे सेवन केल्यास विस्मृतीचा विकार दूर होऊ शकतो, असा शोध काही संशोधकांनी लावला आहे. विस्मृतीच्या विकाराला अल्झायमर असे शास्त्राrय नाव आहे. सध्या यावर एसिटाईल कोलिन एस्तरेज नामक द्रव्य औषध म्हणून उपयोगात आणले जाते. त्यापेक्षाही अधिक चांगला परिणाम वन्य वनस्पती व त्यांची फळे यापासून होतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे. विशेषतः छत्तीसगड आणि झारखंड येथील वनांमध्ये मिळणारी 30 प्रकारची फळे या विकारावर सर्वाधिक उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे.
या फळांवर अधिक संशोधन सुरू आहे. पिंपळ (फाईकस रिलिजिओसा), कसही (ब्रायडेलिया रिटय़ुसा), तेंदू (डायोस्पाईरस मेलिनोजाईनोल), कदम्ब (नियोलेर्मातिया कदम्बा), छिन (फिनिक्स सिल्वेस्ट्रिक्स), भेलवा (सेमेकार्प्स एनार्काडियम) इत्यादी वृक्षांची फळे उपयुक्त आढळली आहेत. स्मृतीची क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक असणारी सहा द्रव्ये या फळांमध्ये सापडली आहेत. या फळांच्या सेवनाने न्युरोट्रान्समीटरची सुरक्षा अधिक प्रमाणात वाढते. ज्यामुळे विस्मृती दूर होऊ शकते.
आपल्या मेंदूत असंख्य संपर्क पेशी असतात. या पेशींमध्ये सूचनांचे आदानप्रदान होत असते. हे आदानप्रदान करण्यासाठी एसिटाईल कोलिन हे द्रव्य उपयोगी पडते. तथापि, विस्मृतीच्या विकारात एसिटाईल कोलिन एस्तरेजचे प्रमाण वाढते. त्यामुळे एसिटाईल कोलिन या द्रव्याचा प्रभाव हळूहळू नाहीसा होत जातो. वन्य फळांमुळे एसिटाईल कोलिनची मात्रा वाढून स्मृतीला साहाय्य मिळते, असे आढळले आहे.