ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय रेल्वे प्रशासनाने 30 जून पर्यंतची सर्व तिकिटे रद्द केली आहेत. तिकिटे रद्द करण्यात आलेल्या सर्व प्रवाशांना रेल्वेकडून तिकिटाचे पैसे परत केले जाणार आहेत.
30 पर्यंतचे सर्व तिकिटे रद्द करण्यात आली असली तरी ही स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी सुरू केलेली श्रमिक विशेष ट्रेनची सेवा मात्र सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रद्द करण्यात आलेल्या तिकिटांमध्ये मेल, एक्सप्रेस तसेच लोकल उपनगरीय रेल्वे तिकिटांचा समावेश आहे.
दरम्यान, रेल्वे पुढं सुरू करण्यात आलेल्या विशेष ट्रेन साठी आत्तापर्यंत 2 लाख 34 हजार 411 प्रवाशांनी तिकीट बुकिंग केले आहे. तर प्रवासी रिझर्वेशन सिस्टिमच्या अंतर्गत आत्तापर्यंत 45.30 कोटींची कमाई झाली आहे.
त्याचबरोबर रेल्वे प्रशासन 22 मे पासून मेल, एक्सप्रेस आणि शताब्दी गाडी सुरू करण्याच्या विचारात आहे. परंतु सध्यातरी जून पर्यंतची बुकिंग रद्द करण्यात आली आहेत.