दिल्ली/प्रतिनिधी
नागालँडमध्ये लष्कराचा गोळीबार ही चूक असल्याचे केंद्र सरकारने सोमवारी संसदेत मान्य केले. लष्कराच्या गोळीबारात १४ सामान्य नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर विरोधकांनी संसदेत सरकारकडे जाब विचारला होता. याप्रश्नी सोमवारी गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत सरकारची बाजू मांडली. त्यानुसार लष्कराने नागरिकांची ओळख पटवण्यात चूक केल्याची कबुली देत घडलेल्या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त केली. या घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली असून तपास अधिकारी महिन्याभरात आपला अहवाल सादर करणार असल्याचेही शहा यांनी सांगितले.
दरम्यान, नागालँडमध्ये लष्कराच्या गोळीबारात १४ ठार झालेल्या सर्वसामान्य नागरिकांबाबत केंद्राने सोमवारी साष्टीकरण देत चुकीच्या ओळखीमुळे ६ जणांना ठार केल्याची कबुली संसदेत दिली. यानंतर हिंसाचार उसळला अन् लष्कराला स्वसंरक्षणार्थ गाेळीबार करावा लागला. यात ८ जणांचा मृत्यू झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी लोकसभा व राज्यसभेत हे निवेदन केले.