अग्नि-5 ची वैशिष्टय़े…
तीन टप्प्यात मारा करणारे क्षेपणास्त्र
17 मीटर लांब आणि दोन मीटर रुंद
1.5 टन अण्वस्त्रs वाहून नेण्याची क्षमता
दिशा निर्देशनासह इंजिन क्षमताही मोठी
एकावेळी अनेक लक्ष्ये नष्ट करणेही शक्य
शत्रूचा सहज वेध आणि अचूक मारा करणाऱया अग्नि-5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. 5,000 किमीपर्यंत सहज मारा करणाऱया क्षेपणास्त्राची भारताच्या लष्करी सामर्थ्यात मोठी भर पडली आहे. जमिनीवरून पृ÷भागावर मारा करणारे हे क्षेपणास्त्र ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून हवेत डागण्यात आले. अत्यंत अचूकतेने मारा करणाऱया या क्षेपणास्त्राच्या कक्षेत आता संपूर्ण चीन आणि पाकिस्तानही आला आहे. तसेच या क्षेपणास्त्राद्वारे संपूर्ण आशिया, युरोप, आफ्रिकेच्या काही भागांवर हल्ला केला जाऊ शकतो. या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आल्याने शत्रूराष्ट्रांसह भारताच्या शेजारील देशांना धडकी भरली आहे. आता पुढील टप्प्यात अग्नि-6 क्षेपणास्त्राद्वारे लक्ष्याची क्षमता अर्थात रेंज वाढविण्याची तयारी भारत करत असून सुरक्षा दलाला येत्या काही वर्षातच नवे बळ प्राप्त होणार आहे.
अग्नि-5 हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेले भारताचे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे. भारताकडे असलेल्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांपैकी हे एक आहे. अग्नि-5 च्या यशस्वी चाचणीमुळे भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढली आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱया अग्नि-5 क्षेपणास्त्राची नुकतीच दुसऱयांदा यशस्वी चाचणी घेण्यात आली. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. या क्षेपणास्त्राची रेंज 5,000 किमीपर्यंत आहे. अग्नि-5 मधील तंत्रज्ञान इतरांपेक्षा वेगळे असल्यामुळे त्याच्या वॉरहेडवर एकाऐवजी अनेक शस्त्रे बसवता येतात. हे क्षेपणास्त्र अनेक लक्ष्ये एकाचवेळी नष्ट करू शकते.
50 टन वजनाचे क्षेपणास्त्र
लष्कराच्या विशिष्ट ट्रकमधून एका ठिकाणावरुन दुसऱया ठिकाणी नेता येणारे अग्नि-5 हे क्षेपणास्त्र 17 मीटर लांब आणि दोन मीटर व्यास असलेले 50 टन वजनाचे क्षेपणास्त्र आहे. अग्नि-5 क्षेपणास्त्राचा पल्ला पाच हजार किमी एवढा असला तरी काही तज्ञांच्या मते हे क्षेपणास्त्र आठ हजार किलोमीटरपर्यंत अण्वस्त्रे डागू शकते. हे तीन टप्पात कार्यरत होणारे क्षेपणास्त्र आहे.
अण्वस्त्रवाहक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र
अग्नि-5 हे जमिनीवरून जमिनीवर हल्ला करणारे एक आंतरखंडीय अण्वस्त्रवाहक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राच्या आधी सात यशस्वी चाचण्या झाल्या आहेत. यावेळी पहिल्यांदाच रात्रीच्या वेळी चाचणी घेण्यात आली आणि ही चाचणी यशस्वी झाली. चाचणीसाठी दीड टन स्फोटकांसह क्षेपणास्त्र डागण्यात आले. उपग्रह आणि समुद्रात कार्यरत असलेल्या नौदलाच्या यंत्रणांनी
प्रत्येक क्षणी क्षेपणास्त्र आपले नियोजित कार्य पार पाडत आहे की नाही, याचा वेध घेतला. निष्कर्षानुसार क्षेपणास्त्राने अपेक्षित यश गाठल्याचे दिसत आहे. भारताने रात्रीच्या वेळी केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीत एमआयआरव्ही तंत्रज्ञानाचा वापर केला की नाही, हे जाहीर करण्यात आलेले नाही. या तंत्राच्या मदतीने एकाच क्षेपणास्त्राद्वारे किमान दोन आणि कमाल दहा ठिकाणी स्फोटके टाकून हल्ला करणे शक्मय आहे. जर हे तंत्र डीआरडीओने वापरले असेल तर कोणत्याही वेळी हल्ला करून शत्रूची मोठी हानी करण्याची क्षमता भारताच्या हाती आली, असे म्हणणे योग्य ठरेल.
भारताचे अचूक टायमिंग
‘अग्नि-5’ची यशस्वी चाचणी ही भारताच्या विश्वासार्ह किमान प्रतिबंध साध्य करण्याच्या धोरणाशी सुसंगत आहे. शेजारील चीनसोबतच्या सीमेवर दीड वर्षांहून अधिक काळ तणाव असताना भारताने या क्षेपणास्त्राची आणखी एक चाचणी घेतली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत आहे. भारतात दहशतवादी पाठवून वातावरण बिघडविण्याचा कट रचत आहे. शेजारील राष्ट्रांकडून भारतावर छुप्या पद्धतीने हल्ले करण्याचे सत्र सुरू ठेवले असतानाच भारतीय यंत्रणांनी यशस्वी कामगिरी करत इतर देशांना ताकद दाखवून दिली आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची दखल
भारताकडे सुखोई-30 एमकेआय, मिराजö2000, जॅग्वार, राफेल ही विमाने आहेत. या विमानांमधून निवडक अण्वस्त्रवाहक क्षेपणास्त्र डागणे शक्मय आहे. यामुळे भारताच्या आण्विक हल्ला करण्याच्या क्षमतेत कमालीची वाढ झाली आहे. आता 5,000 किमीपर्यंतच्या अग्नि-5 क्षेपणास्त्राच्या टप्प्यात चीनची अनेक शहरेही आली आहेत. आपल्या विस्तारवादी धोरणांसाठी परिचित असलेल्या चीननेही
प्रसारमाध्यमांमध्ये क्षेपणास्त्र चाचण्यांच्या बातम्या येत असताना शांतता आणि सुरक्षेची चर्चा सुरू केली आहे. भारताने या वर्षी जूनमध्ये अग्नि-प्राईमची चाचणी देखील केली होती आणि ते अग्नि-6 वर देखील काम करत आहे. भारताच्या या प्रगतीची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे.
निवडक देशांकडेच ‘आयसीबीएम’ तंत्रज्ञान...
सध्या जगातील मोजक्मयाच देशांकडे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल्स (आयसीबीएम) आहेत. यामध्ये रशिया, अमेरिका, चीन, फ्रान्स, इस्रायल, ब्रिटन, चीन आणि उत्तर कोरिया यांचा समावेश आहे. या शक्तीने सुसज्ज असलेला भारत हा जगातील आठवा देश ठरला आहे.
शक्तिस्थाने…
अग्नि-5 हे ‘मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल रिएंट्री व्हेईकल’ने सुसज्ज आहे. म्हणजेच एकाचवेळी अनेक लक्ष्य गाठू शकते.
हे क्षेपणास्त्र दीड टन अण्वस्त्र वाहून नेऊ शकते. त्याचा वेग मॅक 24 म्हणजेच ध्वनीच्या वेगापेक्षा 24 पट जास्त आहे.
अग्नि-5 च्या प्रक्षेपण प्रणालीत कॅनिस्टर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्यामुळे हे क्षेपणास्त्र सहज कुठेही नेले जाऊ शकते.
अग्नि-5 क्षेपणास्त्र रेल्वेमार्ग असो वा हवाई मार्ग, कुठेही वापरले जाऊ शकते. ते देशाच्या कोणत्याही कानाकोपऱयात तैनात केले जाऊ शकते
अग्नि-5 क्षेपणास्त्र वापरण्यासही खूप सोपे असल्यामुळे ते देशात कुठेही तैनात केले जाऊ शकते.
अग्नि-5 क्षेपणास्त्राच्या यशामुळे भारतीय लष्कराची आणि सुरक्षा यंत्रणांची ताकद अनेक पटींनी वाढणार आहे
क्षेपणास्त्राचा इतिहास…
अग्नि-5 क्षेपणास्त्राची पहिली कॅनिस्टर चाचणी जानेवारी 2015 मध्ये घेण्यात आली होती. त्यानंतर रोड मोबाईल लाँचरमधून क्षेपणास्त्र सोडण्यात आले. क्षेपणास्त्राची शेवटची चाचणी 10 डिसेंबर 2018 रोजी झाली होती. विशेष म्हणजे आतापर्यंत या क्षेपणास्त्राच्या 7 चाचण्या झाल्या आहेत, त्या सर्व यशस्वी झाल्या आहेत. अग्नि-5 2020 मध्येच सैन्यात सामिल होणार होते. परंतु कोरोनामुळे चाचणीला विलंब झाला.
पाकिस्तान मागे, चीन भारताच्या पुढे
पाकिस्तानच्या गौरी-2 क्षेपणास्त्राची मारक क्षमता 2,300 किमी आहे आणि शाहीन-2 क्षेपणास्त्राचा पल्ला 2,500 किमी आहे. पाकिस्तान शाहीन-3 वर देखील काम करत आहे, ज्याची रेंज 2,700 किमी आहे.
चीनकडे भारतापेक्षा अधिक पल्ल्याची आणि आधुनिक तंत्रज्ञानाची क्षेपणास्त्रे आहेत. चीनच्या डीएफ-31 क्षेपणास्त्राची मारक क्षमता 8,000 किमी आहे आणि डीएफ-41 क्षेपणास्त्राचा पल्ला 12,000 किमी आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ)
विकसित केलेली अग्नि वर्गातील इतर क्षेपणास्त्रे…
अग्नि-1 – सातशे किलोमीटरचा पल्ला असलेले क्षेपणास्त्र. (19 एप्रिल 2012)
अग्नि-2- दोन हजार किलोमीटरचा पल्ला गाठणारे मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र (15 सप्टेंबर 2013) अग्नि 2 क्षेपणास्त्र 20 मीटर लांबीचे असून त्याचे वजन 17 टन आहे. तसेच एक टन इतकी वहनक्षमता आहे.
अग्नि-3- हे क्षेपणास्त्र मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र 3,500 किलोमीटरचा पल्ला गाठू शकते. (31 जानेवारी 2015)
अग्नि-4- हे क्षेपणास्त्र मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र 4,000 किलोमीटरचा पल्ला असलेले आहे. (9 नोव्हेंबर 2015)
अग्नि-5- आंतरखंडिय क्षेपणास्त्र 5,000 किलोमीटरचा पल्ला सहजपणे गाठू शकते.
अग्नि-6- हे आंतरखंडिय क्षेपणास्त्र 6000 ते 10000 किलोमीटर पल्ला असलेले विकसित केले जात आहे.
-संकलन- जयनारायण गवस