प्रतिनिधी / उस्मानाबाद
लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरातील महाराष्ट्र विद्युत वितरणच्या कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करून आंदोलन करण्यात आले.
ठाकरे सरकारने लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करतो म्हणाले त्या नंतर ऊर्जामंत्री म्हणाले की 100 यूनिटपर्यंतचे वीज बिल माफ करू. पण या तिघाडी सरकारने कोणतेच आश्वासन पूर्ण केले नाही. कोरोनामुळे लॉकडाऊन केल्यानंतर सर्व सामान्य जनता, व्यापारी, उध्योगधंदे ठप्प होऊन मोठ्या प्रमाणात सर्वांचे आर्थिक नुकसान झाले. येवढे मोठे संपूर्ण जगावर, देशावर, राज्यावर संकट येऊन सुद्धा राज्य शासनाने कोणतीही सहानभूती दाखवली नाही.
या मुळे भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाच्यावतीने ठाकरे सरकारच्या विरोधात तीव्रपणे निषेद नोंदवला. जर सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन वीज बिल माफ केले नाही. तर भारतीय जनता पार्टी परत एकदा सामान्याच्या हक्कासाठी मैदानात उतरेल याची नोंद घ्यावी. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.नितीनजी काळे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष तथा लातूर शहर जिल्हा प्रभारी श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी तसेच शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.