मंत्रिमंडळाच्या बैठकीतील संकेत
प्रतिनिधी/मुंबई
राज्यात सध्या सुरू असलेला लॉकडाऊन 1 मे रोजी सकाळी सात वाजता संपणारा असला तरी त्याची मुदत पुढे वाढविली जाणार आहे. मुंबईत कोरोना ओसरण्याची चिन्हे दिसत असली तरी राज्यभरात अजून कोरोना दबा धरून आहे. त्यामुळे गाफील न राहता सावध पावले टाकणे आवश्यक आहे. त्यामुळे लॉकडाऊन पुढे वाढविला जाऊ शकतो. मात्र हे 30 एप्रिल रोजी कळणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 14 एप्रिल संध्याकाळपासून राज्यात 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. तो 1 मे रोजी सकाळी 7 वाजता संपणार असल्यामुळे पुढे लॉकडाऊन वाढणार की 1 मे रोजी सकाळी संपणार, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्याबाबतची संदिग्धता संपुष्टात आणली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी लॉकडाऊन वाढवावाच लागणार असल्याचे स्पष्ट केले. लॉकडाऊनसंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे. लॉकडाऊन वाढवावाच लागणार असल्याची परिस्थिती सध्या राज्यात आहे. त्या अनुषंगाने सध्याच्या लॉकडाऊनच्या शेवटच्या दिवशी त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे राजेश टोपे म्हणाले.
सध्या 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यासंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा झाली. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन वाढवावाच लागेल, अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. मंत्रिमंडळाने त्यासंदर्भात देखील चर्चा केली आहे. शेवटच्या दिवशी नक्की 15 दिवस वाढवायचे किंवा किती वाढवायचे यावर निर्णय घेतला जाईल. पण लॉकडाऊनमध्ये नक्कीच वाढ होणार आहे आणि ती किमान 15 दिवसांची होईल असा अंदाज आहे, असे राजेश टोपे म्हणाले.
राज्यात करोनाचा संसर्ग वाढल्यानंतर लॉकडाऊन लागू करण्यात आला. सार्वजनिक वाहतूक तसेच जिह्याबाहेरील येणार्या आणि जिह्याबाहेर जाणार्या वाहनांना ईल्ल्पास बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरू राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुंबईत लोकलच्या प्रवासावर निर्बंध आहेत. आता मुंबई आणि ठाण्यातील रुग्णांची टक्केवारी घटली आहे. पण, विदर्भ आणि मराठवाडयातील अनेक जिह्यात रुग्णांच्या संख्येत घट दिसत नाही. म्हणून लॉकडाऊनचा कालावधी वाढण्यावर विचार करण्यात येत आहे. रुग्णसंख्या वाढत आहे. त्याबरोबर प्राणवायूचा मोठÎा प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. प्राणवायूअभावी नागपूरसारख्या शहरात नवीन कोविड केअर सेंटरला परवानगी दिली जात नाही. रुग्णालयात खाटांची कमतरता आहे. अशी अनेक आव्हाने आरोग्य यंत्रणेसमोर आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन पुन्हा वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. राजेश टोपे यांनी त्याला पुष्टी देणारे स्पष्टीकरण देत लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढणार असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र अंतिम निर्णय 30 एप्रिल रोजी कळणार असल्याचे ते म्हणाले.
कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याचा अंदाज
राज्यातील कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या पहिल्या आठवडÎात पूर्णपणे ओसरेल, असे महत्त्वपूर्ण भाकित टास्क फोर्समधील डॉक्टरांनी वर्तवले आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाटÎाने वाढायला सुरुवात झाली होती. मात्र, या लाटेने उच्चांक गाठला असून आता रुग्णांची संख्या स्थिर होताना दिसत आहे. त्यामुळे 30 एप्रिलपासून राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरायला सुरुवात होईल. त्यानंतर आठवडाभराच्या कालावधीत नव्या रुग्णांची संख्या आणि मफत्यूदर दोन्हीही कमी होतील, असा टास्क फोर्समधील डॉक्टरांचा अंदाज आहे. त्यासाठी गर्दीला आवर घालणे आवश्यक आहे. त्यामुळे हा लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढण्याची शक्यता आहे.