बेंगळूर/प्रतिनिधी
राज्य बोर्ड शाळांमधील इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्याचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेण्यात येईल, असे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी सांगितलेत आहे.
विभागाने भागधारकांशी या विषयावर झालेल्या चर्चेनंतर ते बोलत होते. या बैठकीस शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसह विनाअनुदानित शाळांचे प्रतिनिधी, पालक संघटना आणि शिक्षणतज्ज्ञांसह ४४ लोक उपस्थित होते.
“यावेळी प्रत्येकाने आपापले मत मांडले. एखाद्या निष्कर्षावर येण्यापूर्वी आम्ही या सर्वांचा विचार करू, असे कुमार यांनी सांगितले.
मंत्र्यांच्या कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की बहुतेक प्रतिनिधींनी काही प्रमाणात मूल्यांकन करणे पसंत केले आहे. बहुतेकांचा असा विश्वास आहे की मूल्यांकन केल्याशिवाय मुले कोठे मागे पडतात आणि पुढच्या वर्गात जाण्यासाठी त्यांना कसे पास करावे की नाही समजत नाही. दरम्यान विद्यार्थ्यांमधील शिकण्याची पोकळी दूर केली नाही तर पुढच्या वर्गात मुलांची आवड कमी होईल ही भीती त्यांना आहे.