प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांचा
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात 23 ऑगस्टपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी कोविड निगेटिव्ह अहवाल अनिवार्य नाही, असे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी स्पष्ट केले. म्हैसूर येथे पत्रकारांशी ते बोलत होते. एकाद्यावेळेस विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्यास एका आठवडय़ाची सुटी दिली जाईल. तसेच सदर खोली सॅनिटायझिंग करून एका आठवडय़ानंतर वर्ग पुन्हा सुरू केले जातील, असेही ते म्हणाले.
शाळा सुरू करणे धोक्याचे आहे. मात्र, मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. तज्ञांच्या मतानुसार राज्यात शाळा सुरू केल्या जात आहेत. कोरोनाचा मुलांवर कोणताही परिणाम होत नाही. तसेच प्राणहानीची समस्याही उद्भवत नाही. लवकरच पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू केले जातील. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्याशी याबाबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. कोरोना पॉझिटिव्हिटी दर 2 टक्क्मयांपेक्षा जास्त असलेल्या जिल्हय़ांमध्ये शाळा सुरू केल्या जाणार नाहीत. त्या मुलांना पर्यायी शिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात येईल, असेही मंत्री नागेश यांनी स्पष्ट केले.