प्रतिनिधी/ बेळगाव
रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेला प्रारंभ झाला आहे. तरी शेतकऱयांनी तातडीने या विम्याची रक्कम भरावी असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी हे आवाहन केले असून अधिकाऱयांनीही शेतकऱयांचा विमा उतरवून घेण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची सूचना केली आहे.
या बैठकीला कृषी विभागाचे जिल्हा संचालक शिवनगौडा पाटील, बागायत खात्याचे जिल्हा उपसंचालक रविंद्र हकाटी, लीड बँक मॅनेंजर राहुल, यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. पाण्यावर येणाऱया मका आणि गहू या दोन्ही पिकांवर विमा भरण्यासाठी 16 डिसेंबर 2020 पर्यंत मुदत आहे. तर जवारी, हरभरा व इतर पिकांसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत असून शेतकऱयांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरवषी पिक विमा घेण्यासाठी प्रयत्न केले जातात. शेतकरी त्याला प्रतिसादही देत आहेत. रब्बी पिकाला यावषी विमा जाहीर करण्यात आला असून तातडीने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. या बैठकीत विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. तसेच बँक अधिकाऱयांनाही यावेळी सूचना करण्यात आल्या.