ता.पं.बैठकीत कृषी अधिकारी धारेवर : शेतकऱयांपर्यंत योजना पोहोचविण्याचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
सरकारी काम आणि बारा महिने थांब, अशी अवस्था आता सरकारी कार्यालयांची झाली आहे. शेतकऱयांसाठी महत्त्वाच्या असणाऱया कृषी विभागातही एजंटराज सुरू आहे. त्यामुळे कृषी खात्यातील एजंटगिरी थांबवा आणि सरकारी योजना शेतकऱयांच्या शेतापर्यंत पोहोचवा, असे आवाहन तालुका पंचायत बैठकीत सर्व सदस्यांनी कृषी अधिकाऱयांना केले.
तालुका पंचायत सभागृहात ही बैठक झाली. प्रारंभी माजी आमदार बी. आय. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर व यल्लाप्पा कोलकार यांनी कृषी अधिकाऱयांना धारेवर धरत कोणतीही योजना यशस्वी करायची असेल तर ती शेतकऱयांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. मात्र कृषी खात्यात एजंटगिरी वाढल्यामुळे अनेक योजना निष्फळ ठरत आहेत. याचा फटका शेतकऱयांना बसत आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.
दरवषी कृषी विभागाकडून निकृष्ट दर्जाची बि-बियाणे वितरीत करण्यात येत असल्याने शेतकरी त्रासले आहेत. यावषी सोयाबिन बियाणे निकृष्ट दिल्याने शेतकऱयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. तालुका पंचायत सर्वसाधारण सभेत सदस्यांनी हा आवाज उठवत कृषी विभागात असलेली एजंटगिरी थांबवा, असा इशारा कृषी अधिकाऱयांना करण्यात आला.
कृषी खात्याच्या कोणत्याही कार्यक्रमाला तालुका पंचायत सदस्यांना बोलाविण्यात येत नाही. त्यामुळे जाणूनबुजून आपल्याला डावलण्यात येत आहे. तेंव्हा असे प्रकार थांबणे गरजेचे आहे. बेळगाव तालुक्मयातील अनेक ग्राम पंचायतींमध्ये जी प्लस टू इमारतींची परवानगी आहे. मात्र सध्या ग्राम पंचायतींमध्ये पीडीओंचा भ्रष्टाचाराचा कारभार वाढत चालला आहे. त्यामुळे त्यांच्या मनमानी कारभाराला चाप बसण्याची गरज आहे. बेळगाव तालुक्मयात जी प्लस टू इमारतींना परवानगी देण्यात आली आहे. मात्र ग्रामविकास अधिकाऱयांच्या कारभारामुळे अनेक कंपन्यांनी पाच ते सहा मजली इमारती उभ्या केल्या आहेत, असा आरोपही यावेळी करण्यात आला.
इमारतींना परवाने देण्यासाठी मोठे भ्रष्टाचार तालुक्मयात करण्यात आले आहेत. पीडीओनी कोटय़वधी रुपये घेऊन या इमारतींना परवानगी दिली आहे. अशा सर्व इमारतींना नोटीस पाठविण्याची गरज सभेत व्यक्त करण्यात आली. यावेळी पुन्हा एकदा पीडीओ आणि तालुका पंचायत सदस्यांची बैठक घेण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.
तालुका पंचायत सभागृहात गुरुवारी ही बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका पंचायत अध्यक्ष शंकरराव पाटील होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष मारुती सनदी, कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी उपस्थित होते. बैठकीला सुनील अष्टेकर, निलेश चंदगडकर, आप्पासाहेब कीर्तने, नीना काकतकर, नारायण नलावडे यल्लाप्पा कोलकार, लक्ष्मी मैत्री यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.
कार्यकारी अधिकाऱयांची बदली नकोच
बेळगाव तालुक्मयातील विकासासाठी तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी हे झटत आहेत. असे असताना त्यांच्याकडून चुकीची कामे करून घेण्यासाठी अनेकांनी आपल्या पक्षाचा आणि पदाचा गैरवापर केला आहे. तेंव्हा त्यांची बदली करण्यासाठी अनेक जण त्यांना त्रास देत असल्याच्या घटना उघडकीस आल्या असून आपला कार्यकाळ असेपर्यंत तेच अधिकारी म्हणून राहिले पाहिजेत, असे मत तालुका पंचायतीच्या सर्वसाधारण बैठकीत सदस्यांनी व्यक्त केले.