ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
विरोधकांच्या प्रचंड गदारोळात वादग्रस्त शेती विधेयके अखेर आवाजी मतदान घेऊन राज्यसभेत मंजूर करण्यात आली.
कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, शेतकरी (सशक्तिकरण आणि संरक्षण) मूल्य आश्वासन तसेच कृषि सेवा विधेयक आज राज्यसभेत सादर केले. या विधेयकाला विरोधकांनी राज्यसभेत जोरदार विरोध केला. विरोधकांनी वेलसमोर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर जोरदार घोषणाबाजी केली.
विरोधकांकडून विधेयक हिसकावण्याचा तसेच उपसभापतींसमोरील माईक तोडून नेण्याचा प्रयत्न झाला. मात्र, या सर्व गदारोळातच आवाजी मतदान घेऊन ही विधेयक मंजूर करण्यात आली.
कृषी क्षेत्र खुली करण्यासाठी भाजपडून ही तीन विधेयक राज्यसभेत मांडण्यात आली होती. ही विधेयके मंजूर झाल्याने शेतकरी त्यांचा शेतमाल देशभरात कुठेही मुक्तपणे विकू शकतील. मी शेतकऱ्यांना आश्वासित करतो की ही विधेयके एमएसपीशी संबधित नाहीत, असे तोमर यांनी सांगितले.