प्रतिनिधी/ सातारा
साताऱयातील गुरुवार पेठेतील एका विवाहितेचा एप्रिल 22 ते आजमितीपर्यंत शारीरीक, मानसिक छळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तसेच सासऱयांनी विनयभंग केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पती, सासरे, नणंद यांच्यासह सहाजणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रारदार विवाहिता रुबिना तौसिफ शेख (रा. गुरुवार पेठ, सातारा सध्या रा. दिव्यनगरी, कोंडवे, ता. सातारा) हिला तू रोगट आहे, तुला मूल होत नाही, तुझा पायगुण चांगला नाही. तुझ्यामुळे सासूला कॅन्सर झाला तर पतीला ऍटक आल्याचा आरोप करत सासरच्या लोकांनी लोकांनी शारीरीक, मानसिक छळ केला. तसेच मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली. सासरे सलीम इस्माईल शेख यांनी तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत विनयभंग केल्याची तक्रार रुबिना यांनी दिली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी पती तौसिफ सलीम शेख, सासरे सलीम शेख, नणंद शगुसा जमीर पठाण, जमीर पठाण, नणंद आसमा मोहसीन मुल्ला (सर्व रा. गुरुवार पेठ, सातारा) व रफीक शेख (रा. शाहूनगर, सातारा) यांच्याविरुध्द जाचहाट तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हय़ाचा पुढील तपास पोलीस नाईक दगडे करत आहेत.