प्रतिनिधी/ बेळगाव
चंदगड तालुक्मयातील शिनोळी औद्योगिक परिसरातील अनेक केंद्रात बेळगावसह आसपासच्या ग्रामीण भागातील असंख्य कर्मचारी – कामगार वर्ग कामासाठी जात असतो. मात्र सध्या महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीमुळे सीमाभागातील या कामगारांना त्या ठिकाणी जाण्यावर प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. यामुळे या कामगार वर्गाच्या कुटुंबियांचे हाल होत आहेत. शिनोळी नाक्मयावर तसेच उचगाव फाटय़ावर चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. तर कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणाऱया तसेच महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱया नागरीकांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातील परिस्थितीमुळे प्रशासनाने आंतरराज्य प्रवेशबंदी घातल्याने कामगारवर्गासह शिनोळी येथील उद्योजकांनाही मोठा फटका बसत आहे.
सध्या लॉकडाऊनमध्ये शिथीलता असली तरी सीमाभागातील बऱयाच कामगारांना शिनोळीला जाता येत नाही. शहरापासुन सुमारे 15 कि. मी. अंतरावर तसेच बेळगाव तालुक्मयाला लागूनच असलेल्या चंदगड तालुक्मयातील शिनोळी येथील औद्योगिक वसाहतीत सीमाभागातीलच सुमारे 50 टक्के कामगारवर्ग आहे. गेल्या अनेक वर्षापासून शिनोळीला या कामगारांची ये-जा सुरू होती. परंतु लॉकडाऊनमुळे गेल्या अडीच महिन्यापासुन निर्बंध आल्याने त्यांची परवड सुरू झाली आहे. महाराष्ट्र सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. यामुळे आंतरराज्य प्रवेशावर कर्नाटक सरकारद्वारे निर्बंध घालण्यात आले आहेत. बेळगाव शहरासह तालुक्मयातील तुरमुरी, उचगाव, कुदेमनी आदींसह अन्य गावातील असंख्य कामगारांना याचा फटका बसला आहे. तर उपलब्ध कामगार वर्गावरच उद्योग सुरू करण्याची वेळ शिनोळी येथील उद्योजकांवर आली आहे.
सध्या महाराष्ट्रात जाण्यासाठी केवळ गुड्स वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. यामुळे सीमाभागातील कामगार वर्गाला शिनोळीला जाणे अशक्मय बनले आहे. सध्या विविध कंपन्यांची बससेवाही स्थगित करण्यात आली आहे. यामुळे परिवहन खात्याच्या बसेसची सोय करून कामगार वर्गासाठी खास ओळखपत्राची व्यवस्था करणे शक्मय आहे. मात्र यासाठी जिल्हाधिकाऱयांची परवानगी आवश्यक आहे. याबाबत उद्योजकांनी पुढाकार घेऊन जिल्हाधिकाऱयांकडे मागणी केल्यास काही प्रमाणात यश मिळण्याची शक्मयता आहे, यासाठी उद्योजकांनीच आता जिल्हाधिकाऱयांना भेटून मागणी करणे गरजेचे बनले आहे.