प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळ तालुका पूरग्रस्त संघर्ष समितीच्यावतीने सोमवार दि. 9 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता तहसील कार्यालय मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. शिरोळ तालुक्यातील सर्व सर्वपक्षीय पूरग्रस्त संघर्ष समिती स्थापन करण्यात आले आहे. शिरोळ तालुक्यातील चोपन पैकी 42 गावांना महापुराचा तडाखा बसला असून शासनाची अध्याप पूरग्रस्तांना कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही पूरग्रस्तसंघर्ष समितीने यापूर्वीच तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांना विविध मागण्याचे निवेदन दिले आहेत.
शिरोळ तालुक्यात महापुराने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाचे कर्मचारी अध्यादेशानुसार पंचनामा करीत नाहीत वेगळी कारणे सांगून पूरग्रस्तांचा पंचनामा करण्यात टाळाटाळ करीत आहेत. सानुग्रह अनुदान घर पडझड पिकाचे पंचनामे व्यापार-उद्योग शेतीच्या पंचनामे बाबत टाळाटाळ करीत आहे. संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी पूरग्रस्त नागरिकांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी यांसह अन्य मागण्यांसाठी सोमवारी 9 ऑगस्ट क्रांती दिन भव्य मोर्चा काढण्यात येणार असून नागरिकांनी शिरोळ येथील शिवाजी चौकात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
माजी आमदार उल्हास पाटील भाजपाचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, धनाजी चुडमुंगे, डे जि प सदस्य अशोकराव माने जि प सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्यासह अन्य नेतेमंडळी मोर्चाा यशस्वी पार पडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.