प्रतिनिधी / कोल्हापूर
शेतकऱ्यांनी माती परिक्षण करुन खतांचा वापर केल्यास अतिरिक्त खतांचा वापर कमी होईल. त्यामुळे जमीनाला आवश्यक तितकेच घटक मिळतील. यातून शेतकऱ्यांचा पैसा वाचणार आहे. त्यामुळे शेतकऱयांनी माती परिक्षण करावे, असे आवाहन झुआरीचे महाव्यवस्थापक दिलीप चव्हाण यांनी केले. ते कोल्हापूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते. महालक्ष्मी मंगल कार्यालय येथे झालेल्या मेळाव्यास शेतकरी, कृषी तज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरवातीला दिवंगत पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यानंतर कंपनीतर्फे तयार केलेल्या जय किसना अॅपचे अनावरण झाले. तानाजी मोरे, हिंदुराव पाटील, या शेतकऱ्यांचा किसान दिनानिमित्त प्राथनिधीक स्वरुपात सत्कार केला.
कोल्हापूर विभागीय व्यवस्थापक नागेश पाटील यांनी कंपनीच्या विविध उत्पादनांची माहिती दिली. ते म्हणाले, वातावरणातील बदलामुळे शेतीचे चक्र बदलत चालले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे, झुआरीतर्फेही शेतकरी मेळावे घेऊन पीक प्रत्याक्षिकासह शेतकऱ्यांना मोफत सल्ला दिला जातो.
मुख्य व्यवस्थापक कालीदास सावंत यांनी कंपनीच्या विविन नविन उत्पादनांची माहिती आणि त्याचा वापर कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले. एस. बी. कोरडे यांनी पीक संरक्षक औषधे वापरण्याविषयी सल्ला दिला. मुख्य व्यवस्थापक सुभाष फाळके यांनी खत प्रणालीची माहिती दिली. सुत्र संचालन, आभार चेतन देशमाने यांनी मानले.