गणपती बाप्पांचे उत्साहात स्वागत : चाकरमान्यांचे आगमन
संततधार पावसानंतरची उघडीप खरेदीसाठी सुखावह
जिल्हाभरात चैतन्याचे वातावरण
भाग्यविधाता वारंग
झाराप:
सुख-समाधान यासह आनंदाची अनुभूती देणाऱया, पावित्र्य व मांगल्य यांचे प्रतीक असणाऱया, ज्ञान आणि बुद्धीची देवता समजली जाणाऱया तसेच कलात्मकतेला चालना देणाऱया आणि नकारात्मकतेला दूर सारण्याची उर्जा निर्माण करणाऱया मंगलमूर्ती विघ्नहर्त्या श्री गणपती बाप्पांचे उत्साहात स्वागत करण्यात येत असून जिल्हाभरात सर्वत्र आज (शुक्रवार) ‘श्रीं’ची विधीवत प्रतिष्ठापना होत आहे. चैतन्यपूर्ण वातावरणात आजपासून भावभक्तिची मांदियाळी सुरू होत आहे.
परंपरा तसेच इतिहास असणारा गणेशोत्सव जगभरात साजरा होत असला, तरी तळकोकणात विशेषतः मोठय़ा उत्साहात हा उत्सव साजरा केला जातो. गेल्यावषी या उत्सवावर कोरोनाचे सावट राहिले. त्यातून सावरत, शिकत व वेळीच औषधोपचार करून यावर मात करण्याचे मनोधैर्य बाळगत यावषी काळजी घेत ‘श्रीं’च्या उत्सवाची तयारी गेले अनेक दिवस सुरू होती. लाडक्मया देवबाप्पांच्या आगमनाबरोबरच आजपासून सर्वत्र ‘मंगल’मय वातावरणाची निर्मिती सुरू होत आहे.
उत्सवाची विशेष खरेदी सर्वत्र
गेले दोन-तीन दिवस संततधार पावसातही विरळ गर्दीत उत्सवाची विशेष खरेदी जिल्हय़ात सर्वत्र सुरू होती. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पावसाने बऱयापैकी उघडीप दिली. गुरुवारी दिवसभर नैसर्गिक ‘रान’ साहित्यानेही बाजार व्यापून राहिला. उशिरापर्यंत बाजारहाट सुरू होती. गुरुवारी ‘हरितालिका’ व्रत पाळण्यात आले. यासाठी शहाळी, फळफळावळ यांचा बाजारही मोठा भरला होता. शहरी बाजारपेठांसह ग्रामीण भागातील रस्त्यांवर, चौकाचौकात ‘माटवी’च्या साहित्याची छोटी-मोठी खरेदी सुरू होती.
पावसाला चकवत बाप्पांना घरी आणण्याची लगबग
पावसाचा अंदाज बघत आपल्या गणपती बाप्पांना घरी आणण्याची लगबग गेले दोन दिवस सुरू राहिली. कोविड निर्बंधांमुळे गणपती शाळांतील शेवटच्या काही दिवसांतील कारागिरांची धावपळही मोठी होती. गेल्या काही दिवसांतील गणपती शाळांतील वातावरणही भारलेले, मंतरलेले असेच होते. पावसाचा ‘ऑरेंज’ अलर्ट वर्तविण्यात आला असल्याने परिस्थिती पाहत गणेश मूर्तींना घरी आणण्याचे प्रयत्न ठिकठिकाणी सुरू होते. काही ठिकाणी खराब रस्त्यांच्या संकटाचा सामना करावा लागला. एका वाहनातून सावकाशपणे एकत्रितपणे मूर्त्या नेणे पसंत केले जात होते.
चाकरमान्यांचे आगमन
उत्सवाच्या निमित्ताने विशेषतः शनिवारपासून चाकरमान्यांचे आगमन जिल्हय़ात सुरू झाले. विशेष रेल्वेसेवा, रा. प. च्या खास बसेस, खासगी बसेस व वाहने आदींमधून चाकरमानी कोकणात उतरले. यावेळी महत्त्वाच्या ठिकाणी तपासणी, सुरक्षा, आरोग्य सुविधा यांच्या अनुषंगाने आरोग्य, शिक्षण, महसूल आदींची विशेष पथके तैनात करण्यात आली. चाकरमान्यांचा प्रवास सुलभ व्हावा, यासाठी राष्ट्रीय महामार्गावर सोळा टनांपेक्षा जास्त वजनाच्या वाहनांना 8, 9, 10 तसेच 14, 15, 19, 20 सप्टेंबर रोजी बंदी घालण्यात आली आहे. गणेशोत्सव आणि कोकणातील चाकरमानी हे दृढ समीकरण सर्वज्ञात आहे. चाकरमान्यांचे आगमन, नातेवाईक-आप्तेष्टांची भेट व घरातील ‘श्रीं’चा सहवास यामुळे आजपासून वातावरण अधिक प्रसन्न होत जाणार आहे.
‘गौराई’साठी हळद संगोपन : माडय़ाचीवाडी हायस्कूलचा उपक्रम
गणेशाचे पूजन करताना सोबत गौरी म्हणून ‘हळदी’च्या रोपाचे पूजन केले जाते. उत्सवाचा कालावधी मोठा असल्याने हे रोप नंतर वाळून गेलेले असते. मूर्तीबरोबर त्याचे विसर्जनही केले जाते. अशी अनेक रोपे वाया जातात. यासाठी कुडाळ तालुक्मयातील माडय़ाचीवाडी हायस्कूलच्या आय. बी. टी. या मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख उपक्रमांतर्गत यावषी हळदीची पिशवीतील रोपे शाळेत तयार करण्यात आली. एक रोप प्रति वीस रु. या दराने विक्रीस ठेवण्यात आली. त्याला प्रतिसादही चांगला मिळाल्याचे शिक्षक दीपक सामंत यांनी सांगितले. रोप पिशवीमध्ये मातीत रुजविल्यामुळे गणपती विसर्जनापर्यंत जिवंत राहिल व त्याची नंतर लागवडही करता येईल हे पर्यावरण मूल्य ओळखून यावषी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
पर्यावरण पूरक उत्सवासाठी राष्ट्रीय हरित सेनेचे आवाहन
राष्ट्रीय हरित सेनेच्यावतीने पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती न वापरणे तसेच सजावटीसाठी थर्माकोलचा वापर टाळणे, कर्णकर्कश आवाजाचे फटाके न फोडणे, विसर्जनावेळी निर्माल्य नदीपात्रात न सोडता झाडाच्या मुळात किंवा खत निर्मितीसाठी वापरणे, मूर्तीचे विसर्जन हौद किंवा कृत्रिम तळी यामध्ये करणे. गणेशोत्सवाचे पावित्र्य आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्याची जबाबदारी सर्वांनी स्वीकारावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ला सक्षम पर्याय व ‘शाडूच्या’ मातीची कमतरता भरून काढण्यासाठी म्हणून जिल्हय़ात तयार झालेल्या नैसर्गिक ‘गोमय’ गणेश मूर्तींचे पूजन जिल्हय़ात तसेच जिल्हय़ाबाहेरील मोठय़ा शहरातही करण्यात येत आहे.
गणेशोत्सवाचे पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज ओळखून उत्सव पर्यावरण पूरक होण्यासाठी जिल्हय़ासह राज्यभरात पर्यावरण पूरक आरास- सजावट अशा स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या आहेत.
‘सृजन’ उत्सवाची साथसंगत वाढती
मंगलमूर्तींची मनमोहक सुबक अशी आरास, विशेष सजावट तसेच पूजा-अर्चा, मंत्रपुष्पांजली, धूपारत्या, भजनी मेळय़ांचा मधुर नाद, फुगडय़ा, नातेवाईकांच्या भेटी- गाठी यासह करंज्या, लाडू, मोदक, उसळ आदी बरोबरच स्वयंपाकाची रेलचेल यामुळे एकूणच ‘सृजन’ उत्सवाची साथसंगत जिल्हय़ात ठिकठिकाणी वाढत जाणार आहे.
शनिवार 11 सप्टेंबर-ऋषिपंचमी
रविवार 12 सप्टेंबर-ज्येष्ठागौरी आवाहन
सोमवार 13 सप्टेंबर-ज्येष्ठागौरी पूजन
मंगळवार 14 सप्टेंबर-ज्येष्ठागौरी विसर्जन
रविवार 19 सप्टेंबर-अनंत चतुर्दशी