तरुण भारत
संवाद प्रतिनिधी/ वैराग
जगासह देशात
कोरोना व्हायरसने धुमाकूळ
घातले आहे. सरकारने
संचारबंदी लागू केली आहे.
तरीही वैराग मधील
नागरिक घराबाहेर पडून मोठी
गर्दी करीत असल्याचे पाहिला
मिळाले. पोलिसांनी
वेळोवेळी सूचना करून देखील
नागरिकांकडून याचे पालन होत
नसल्याचे चित्र पहायला मिळत
आहे.
वैराग शहरातील लोक चौका- चौकात गर्दी करीत असल्यामुळे ग्रामीण पोलिसांकडून प्रसाद दिला जात आहे. मात्र तरीही नागरिक चौका- चौकात गर्दी करीत आहेत. तर भाजीपाला खरेदीसाठी भाजी- मंडईत मोठी गर्दी करीत आहेत. नागरिक वैराग पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक आरुण सुगावकर,यांनी गावोगावी फिरून गर्दी हटवत आहेत. मात्र पोलिस गेल्यानंतर लोक पुन्हा चौकात, मंदिरात गर्दी करीत आहेत. त्यामुळे गावातील चौकातील गर्दी कमी होत नसल्याचे चित्र वैराग ग्रामीण भागात दिसत आहे.
गावात गर्दी वाढली
कोरोना व्हयरसमुळे शहरी भागातील नागरिक गावाकडे मोठ्या प्रमाणात आले आहेत. गावात आल्यानंतर घरात बसण्याऐवजी चौका चौकात गर्दी करीत आहेत. तर काही लोक घरातच बसणे पसंत करीत आहेत. गावातील आणि बाहेरून आलेले लोक एकत्रित येत आहेत. त्यामुळे गावात गर्दी वाढत आहे. ]