प्रतिनिधी /बेळगाव
अनगोळ येथील संत मीरा स्कूलमध्ये वनमहोत्सव मोठय़ा उत्साहात पार पडला. 5 जून पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून या वनमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जन कल्यान ट्रस्टचे सदस्य कृष्णा भट, श्रीकांत कदम, आनंद कालिंगण्णवर, शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, ऋतुजा जाधव, विनाश्री तुक्कार, सी. आर. पाटील, चंद्रकांत तुर्केवाडी, अनुराधा पुरी, आशा कुलकर्णी, सुजाता पाटील, गीता वर्पे या मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी कृष्ण भट्ट म्हणाले, केवळ झाडे लावून उपयोग होणार नाही त्याची निगा करून वाढविणे गरजेचे असते. वृक्षांपासून आपणाला ऑक्सिजन मिळतो, कोरोना काळात ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली होती. पुन्हा तशी स्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येकाने झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम राबविण्याची गरज आहे. यावेळी बसवंत पाटील, भारती बाळेकुंद्री, लक्ष्मी पेडणेकर, सुरेखा शहापूरकर, रेणुका काळे, सुनिता पाटील, अश्विनी लोहार, सुजाता होळकर, रेखा मलतवाडी, प्रिया जाधव, रुपा सुपण्णावर व शिक्षकवर्ग उपस्थित होता. क्रीडा शिक्षिका अनुराधा पुरी यांनी आभार मानले.