दिल्लीत आणि पाश्चात्य देशांमध्ये पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अशा स्थितीत दिवाळीनंतरचे पंधरा दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असतील. थंडी सुरू होत असताना विषाणू पुन्हा वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे अधिक सावध राहा. उद्या जर दुप्पट-तिप्पट लाट आली तर त्रेधातिरपीट होऊ शकते. आपण इतके दिवस केलेली मेहनत वाया जाऊ शकते असा सावधानतेचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्यावर उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत. मात्र या इशाऱयामागील गांभीर्य लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. तसे न होता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलेले वक्तव्य योग्य की उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य योग्य, राज्यातील मंदिरे उघडायला सरकार मुद्दामहून वेळ करत आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. अर्थात मुख्यमंत्री आणि सरकारी यंत्रणेला प्रश्न हा विचारलाच पाहिजे. पण त्याचवेळी सार्वजनिक आरोग्याचीही चिंता वाहिली पाहिजे. याबाबत वारकरी सांप्रदायातील एका तात्यांनी व्यक्त केलेला संताप सात्विक म्हणावा असा नाही. त्याउलट राष्ट्रीय वारकरी पाईक संघासारख्या संघटना आणि विविध संतांच्या वंशजांनी एकत्र येऊन कार्तिकी यात्रा समन्वय समिती स्थापन करून संचारबंदी लागू न करता मर्यादित वारकऱयांना कोरोना नियम पाळून यात्रेला कसे येऊ देता येईल याबाबत प्रस्ताव दिला आहे. यात आरोग्य सुरक्षेशी कोणतीही तडजोड न करता कोरोना प्रतिबंधक नियमानुसार वारी भरवण्यासाठी एक आराखडा शासनाला सादर केला आहे. तोंडाची वाफ दवडणाऱयांपेक्षा अशा प्रयत्नांना विधायक किंवा वारीच्या विचारांशी सुसंगत म्हणता येईल. राज्य शासनाने त्याबाबत गांभीर्याने निर्णय घेतला पाहिजे. लोक जेव्हा स्वतःहून एखादा पर्याय सरकारसमोर मांडतात तेव्हा शासकीय यंत्रणेनेही आपलेच खरे न म्हणता लोकांच्या पर्यायावर विचार आणि चर्चा करणे आणि त्यातूनही धोका असेल तर तो संबंधितांना पटवून सांगणे आवश्यक आहे. मात्र लोकांचे न ऐकता आम्ही मनमानी करू असे सरकारने वागले नाही पाहिजे. एक मोठा जनसमुदाय सरकारच्या विरोधात उभा करता येतो अशा कोत्या विचाराने विरोधातील मंडळींनीही अनावश्यक आग्रह करणे टाळले पाहिजे. मंदिरांची दारे खुली करा असे म्हणत राहणे आणि मद्यालये सुरू झाली देवालये का नाही अशी चुकीची तुलना टाळली पाहिजे. अशी तुलना करणाऱयांना नगर जिह्यातील अकोळनेर गावची घटना माहीत करून दिली पाहिजे. राज्यभरात रुग्ण संख्या कमी होत असताना आणि अनेक तालुक्मयांमध्ये गेले 2-3 दिवस एकही रुग्ण सापडला नाही अशी स्थिती असताना नगर तालुक्मयातील अकोळनेर येथील 44 लोकांना अचानक कोरोनाची बाधा झाली आहे. अद्याप 128 लोकांचे अहवाल येणे बाकी आहे. राज्यात एकाच गावात अचानक इतके रुग्ण का वाढू लागले याचा शोध घेतला तेव्हा समजले की, कोजागरी पौर्णिमेच्या रात्री या गावातील लोकांनी भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. भजनाला अपेक्षेप्रमाणे गावातील ज्ये÷ नागरिकांची संख्या अधिक होती. भजनानंतर तीन दिवसांनी गावात लोकांना त्रास जाणवू लागला. खबारदरी म्हणून केलेल्या तपासणीत एकाच दिवसात 44 लोकांना कोरोना झाल्याचे अहवाल आले. अद्याप 128 अहवाल प्रलंबित आहेत. त्यामुळे संपूर्ण गाव हादरले आहे. आता या गावाला अक्षरशः जगापासून तोडले आहे. दिवाळी संपेपर्यंत या गावातून बाहेर कोणी जायचे नाही आणि गावात कोणी यायचे नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. घरटी रुग्ण सापडू लागल्याने गावातील प्रत्येकाची तपासणी करायचीच असा निर्णय घ्यावा लागला आहे. नगरप्रमाणेच संगमनेर तालुक्मयातील रुग्ण वाढत आहेत आणि त्याचीही चिंता व्यक्त होत आहे. नगर हा राज्यातील एक मोठा जिल्हा आहे. राज्यातील बहुतांश विभागाना तो जोडलेला आहे. तिथे होणारा प्रसार इतरत्रही प्रभावित करणारा ठरतो. एका भजनाचा परिणाम जर असा असेल तर कार्तिकी वारी नेहमीप्रमाणे विना अडथळा झाली पाहिजे म्हणणाऱया आणि त्यानिमित्ताने दोषारोप करणाऱयांनी एकदा तारतम्याने विचार केलेला बरा. राज्यभरात दिवाळीच्या खरेदीसाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. सर्वत्र प्रचंड झुंबड उडालेली आणि शारीरिक अंतर नियमाला झुगारून दिल्याची अनेक उदाहरणे दिसत आहेत. गर्दी पाहून लोकांच्या अंगावर काटा उभा राहतो. पण तरीही ते त्या गर्दीचा भाग बनतात. वाढत्या थंडीत विषाणू पसरतो हे दिल्लीमध्ये दिसून आले आहे. असे असताना फक्त इंग्लंडमध्ये आणि पाश्चात्य देशातच रुग्ण वाढत आहेत त्याचा भारतीयांवर परिणाम होत नाही असे म्हणणे पूर्णतः चुकीचे आहे. दिवाळी आणि नंतरचे पंधरा दिवस प्रत्येकाने स्वतःचे आणि इतरांचे रक्षण केले पाहिजे, फटाक्मयांमुळे फुफ्फुसाला होणाऱया त्रासामुळे फटाके फोडताना तारतम्य बाळगावे असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे. पाठोपाठ मुंबई महापालिकेनेही सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्यास बंदी घालताना दिवाळीच्या रात्री 8 ते 10 या वेळेत निवडक फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यास मुभा दिली आहे. आता राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थाही काही निर्णय घेतील तर त्यांना सध्याच्या संकटाच्या काळात आपल्या भागाला सुरक्षित राखणे शक्मय होणार आहे. या संकटातून बाहेर पडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गेले आठ महिने संपूर्ण देश आणि जग महामारीच्या विळख्यात अडकले आहे. अशावेळी यातून बाहेर पडण्यासाठी जे जे करणे शक्मय आहे ते करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. गेले आठ महिने पाळलेल्या निर्बंधांमुळे सणाच्या काळात लोक ते निर्बंध झुगारून गर्दी करत आहेत. नवे रुग्ण आढळले नसल्याने लोकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे धाडस केले जात आहे. पण कोजागरीला भजनासाठी जमलेल्या मंडळींप्रमाणे हे धाडस अंगलट येऊ शकते याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
Previous Articleनाग्या सूड उगवतो
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.