जयभीम सफाई मजदूर संघटनेचे निवेदन
बेळगाव : तुरमुरी कचरा डेपोमध्ये कचरा टाकताना वाहनाची धडक बसून मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई द्यावी तसेच त्यांच्या कुटुंबातील एकाला महापालिकेमध्ये नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी जयभीम ऑल इंडिया सफाई मजदूर, काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शहरातील कचरा वाहनांतून तुरमुरी डेपो येथे टाकला जातो. त्या ठिकाणी त्या वाहनांतून उतरून कचरा बाहेर काढताना त्याच वाहनाची धडक बसली आणि कल्लाप्पा बसवंत कांबळे यांचा मृत्यू झाला. यामुळे त्यांचे कुटुंबीय अडचणीत आले आहे. तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई द्यावी तसेच एका व्यक्तीला नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी काशिराम चव्हाण, मुरली चव्हाण, विवेक घाटकांबळे, सुभाष चव्हाण, संजय भंडारी, अमर वाल्मिकी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले.