बेळगाव ः सदाशिवनगर येथील समता भगिनी मंडळातर्फे ‘संक्रांतीचे हळदीकुंकू’ हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अंजलीताई गाडगीळ प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यांनी दासबोध या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी मीना नाडगौडा यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी सर्व महिलांनी समारंभाच्या निमित्ताने एकत्रित येण्याची संधी मिळत असल्याचे नमूद केले. यावेळी स्मिता मदली, सुमित्रा मुचंडीकर, राजश्री महागावकर, विजया पाटील, सीमा आकलेकर, अनिता मुरकुटे, शालिनी पाटील, लीला पाटील, सुखदा शेणे, रंजना हेरेकर, उषा जैन, मनीषा पोरवाल, सुजाता अष्टेकर, माधुरी माळी, कोमल हुदलीकर, हेमा मिरजी, आरती मेत्री, गायत्री पाटील, सविता खोबरे, नीता हत्तरकी, अमृता काळे, आरती मदली, नीता नाईक, स्नेहा जोगळेकर, विजया बांदिवडेकर, सई शेणे उपस्थित होत्या.
Previous Articleकोरोना : दिल्लीत 130 नवे रुग्ण; 153 डिस्चार्ज
Next Article धोकादायक झाड हटविण्याची मागणी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.