नगर / प्रतिनिधी :
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या मागील पाच वर्षांच्या काळात राज्यात सर्वांधिक विकासात्मक कामे झाली. सध्या मात्र वैचारिक भूमिका नसलेले महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. त्यांनी निवडणुकीपूर्वी मोठय़ा थाटात नुकसानग्रस्त शेतकऱयांना एकरी 25 हजार, हेक्टरी 50 हजार रुपयांची मागणी केली. तसेच सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले. मात्र, सत्तेवर येताच त्यांना शब्दाचा विसर पडला असून, या सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याचे टीकास्त्र माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांनी सोडले आहे.
तसेच महाविकास आघाडीचे सरकार जेथे चुकेल, त्यासाठी भाजपा लढा पुकारेल, या शब्दांत आगामी काळातील लढाईचे संकेतही बागडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दिले.