अचूक बातमी “तरुण भारत”ची, रविवार 3 ऑक्टोबर 2021, सकाळी 10.45
● शनिवारी अहवालात 175 बाधित
● एकूण 6,243 जणांची तपासणी
● उद्यापासून शाळांची घंटा वाजणार
● साडे पंचवीस लाख जणांची लसीकरण
● सातारा, फलटण, खटावमध्ये वाढ सुरूच
सातारा / प्रतिनिधी :
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस बागेत वाढीचा आलेख दीडशेच्या खाली घसरला होता. मात्र नंतर तो दोनशेच्या नजीक गेला असून बाधितवाढ दीडशे ते दोनशेच्या दरम्यान स्थिर असताना शुक्रवारी 198, शनिवारी 183, आणि रविवारी रात्रीच्या अहवालात 175 अशी सलग तीन दिवस बाधित वाढ 200 च्या खाली राहिल्याचा दिलासा या स्थितीत लाभलेला आहे. अल्प वाढतही सातारा, फलटण व खटाव या तालुक्यांमध्ये दोन अंकी संख्येने वाढ सुरूच असून अल्प वाढीतही हे तालुके हॉटस्पॉट ठरलेले आहेत. मात्र इतर सात तालुके कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
रविवारी अहवालात 175 बाधित
रविवारी रात्री आलेल्या अहवालात एकूण 6 हजार 243 जणांची तपासणी झालेली असून यामध्ये 175 जणांचा अहवाल बाधित आला असल्याची माहिती प्रशासनाने दिलेली आहे. यामध्ये जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 2.8 टक्के एवढा खाली राहिलेला आहे. मात्र तो त्यापेक्षाही खाली गेल्यास जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होऊ शकते. त्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे.
25 लाख 38 हजार 264 जण लसवंत
जिल्ह्यात लसीकरण चांगल्या वेगाने सुरू आहे. यामुळे एकूण लस घेणार्यांची संख्या 25 लाख 38 हजार 264 एवढी दिलासादायक झालीअसून यामध्ये पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या 18 लाख 14 हजार 51 एवढी झालेली आहे तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 7 लाख 34 हजार 213 एवढी झाली असून लसीकरण साडेपंचवीस लाखांच्या नजीक आहे.
उद्यापासून शाळेच्या घंटा खणखणार
गत दीड वर्षापासून कोरोना संसर्ग मध्ये शाळा महाविद्यालय बंद होती. या कालावधीत युवा आणि बालके घरातच बसून होते. त्यांच्यासाठी विविध प्रकारचे ऑनलाइन उपक्रम राबवण्यात आले तरी शाळा आणि घर आणि ऑनलाइन शिक्षण यामध्ये खूप तफावत आहे. त्यामुळे शाळा सुरू व्हाव्यात अशी सर्वांचीच इच्छा आहे. मात्र दुसरीकडे कोरोनाचे संकट डोक्यावर घोंगावत असताना शाळा सुरू कराव्यात की नाही यावर बरीच खलबते झाली. तोपर्यंत साताऱ्यातील गुरुकुल संस्थेने शाळा सुरू करण्यासाठी काय काय खबरदारी घेऊन शाळा सुरू करता येतील याचा पायलट प्रोजेक्ट शासनाला दिला आणि शाळा सुरू देखील केली आणि आजही ती चांगल्या पद्धतीने सुरू आहे. या पार्श्वभूमीवरच उद्यापासून जिल्ह्यातील शाळांच्या घंटा खणखण येणार असून लाखो विद्यार्थ्यांचा किलबिलाट पुन्हा अनुभवास मिळणार आहे.
शनिवारी जिल्ह्यात
बाधित-183
मुक्त-173
मृत्यू -3
शनिवारपर्यंत जिल्ह्यात
एकूण नमुने–20,93,848
एकूण बाधित–2,48,746
घरी सोडण्यात आलेले–2,39,711
मृत्यू–6,089
उपचारार्थ रुग्ण–5,397