प्रतिनिधी/भिलवडी
कृष्णाकाठावर पाण्याची पातळी स्थिर झाली असून ग्रामस्थांनी घाबरुन न जाता सतर्क राहावे असे आवाहन भिलवडी पाठबंधारे शाखा अभियंता तानाजी काळे यांनी केले आहे.
आज सकाळी ६ वा. भिलवडी पुला खाली ४६ फूट पाणी पातळी होती. यामध्ये वाढ झाली नाही. सदया पाणी पातळीत स्थिरता असून ताकारी मध्ये पाणी पातळीत एक फुटांनी घट झाली आहे. यामुळे ग्रामस्थांनी घाबरुन जाऊ नये. तर भिलवडी पूलावर एक फूट पाणी आहे. तर मैलाना नगर वस्तीत पाणी शिरल्याने ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात आले आहे .भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास कोडग व पोलिस कर्मचार्यांचा नदी पूलावर बंदोबस्त तैनात असून ग्रामस्थांना व पुलावरून वाहतूक करण्यास बंद केली आहे.