जिल्ह्यातील नऊ जणांचा मृत्यूः मनपा क्षेत्रात 36 वाढलेः ग्रामीण भागात 262 वाढलेः उपचारात चार हजार रूग्ण
प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यात सोमवारी नवे 298 रूग्ण वाढले. 509 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्यात आजअखेर 41 हजार 469 रूग्ण झाले आहेत. तर 35 हजार 892 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी उपचार सुरू असताना जिल्ह्यातील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर एक हजार 529 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.
महापालिका क्षेत्रात अवघे 36 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात रूग्णसंख्या आता चांगलीच आटोक्यात येवू लागली आहे. सोमवारी महापालिका क्षेत्रात नवे फक्त 36 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 24 तर मिरज शहरात 12 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आजअखेर 15 हजार 483 रूग्ण झाले आहेत. यातील 86 टक्के रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
ग्रामीण भागात 262 रूग्ण वाढले
ग्रामीण भागातही कोरोना रूग्ण वाढण्याचे प्रमाण आता हळूहळू कमी होत चालले आहे. सोमवारी नवीन 262 रूग्ण वाढले आहेत. यामध्ये आटपाडी तालुक्यात 20 रूग्ण, जत तालुक्यात 19 रूग्ण, कडेगाव तालुक्यात 12 तर कवठेमहांकाळ तालुक्यात 28 रूग्ण वाढले आहेत. खानापूर तालुक्यात 30, मिरज तालुक्यात 30 तर पलूस तालुक्यात 17 नवीन रूग्ण आढळून आले. शिराळा तालुक्यात 37, तासगाव तालुक्यात 32 आणि वाळवा तालुक्यात 37 रूग्ण वाढले आहेत. ग्रामीण भागातही आता रूग्णांचे प्रमाण कमी होत चालले आहे.
जिल्ह्यातील नऊ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू
जिल्ह्यात सोमवारी नऊ रूग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये मिरज शहरातील दोघांचा मृत्यू झाला आहे. आटपाडी तालुक्यातील एकाचा तर कडेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला. खानापूर तालुक्यातील दोघांचा आणि मिरज तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला. वाळवा तालुक्यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजअखेर जिल्ह्यातील एक हजार 529 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
परजिल्ह्यातील सात नवे रूग्ण दाखल
परजिल्ह्यातील रूग्णांच्यावर ही जिल्ह्यात उपचार सुरू करण्यात आले आहेत. सोमवारी परजिल्ह्यातील नवे सात रूग्ण दाखल झाले आहेत. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांचा आणि बेळगाव जिल्ह्यातील पाच जणांचा समावेश आहे. आजअखेर एक हजार 282 रूग्ण दाखल झाले यातील एक हजार 34 रूग्ण बरे झाले आहेत. उपचारात 53 रूग्ण आहेत. तर सोमवारी उपचार सुरू असताना कर्नाटक येथील एकाचा मृत्यू झाला आहे. आजअखेर परजिल्ह्यातील 195 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
दोन हजार 781 जणांचा स्वॅब तपासला
जिल्ह्यात सोमवारी दोन हजार 781 जणांचा स्वॅब तपासण्यात आला आहे. यामध्ये आरटीपीसीमध्ये 860 जणांचा स्वॅब तपासण्यात आला आहे. तर रॅपीड ऍटीजनमध्ये एक हजार 921 जणांचा स्वॅब तपासण्यात आले आहेत. एकूण दोन हजार 781 स्वॅब तपासणीमध्ये 298 नवीन रूग्ण आढळून आले आहेत.
509 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात सोमवारी उपचार सुरू असणारे 509 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे आजअखेर कोरोनावर 35 हजार 892 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा कोरोना बरे होण्याची टक्केवारी वाढली असून ती आता 86 टक्के इतकी झाली आहे. सध्या जिल्ह्यात उपचारात रूग्ण फक्त चार हजार 48 इतके आहेत.
नवीन रूग्ण 298
उपचारात 4048
बरे झालेले 35892
एकूण रूग्ण 41469
मृत्यू 1529