प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कॉलेजरोडचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र धर्मवीर संभाजी चौकातील संपर्क रस्त्यावर रॅम्प घालण्यात आले नसल्याने वाहनचालकांसह सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. केळकर बागेत येणाऱया रस्त्यावर काही नागरिक अडकून पडत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
स्मार्ट सीटी योजनेंतर्गत राबविण्यात येणारी कामे व्यवस्थित आणि वेळेवर होत नसल्याने याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. धर्मवीर संभाजी चौक परिसरात विविध रस्ते मुख्य रस्त्याला जोडतात. पण काँक्रिटीकरण करण्यात आल्यानंतर संपर्क रस्त्यावर रॅम्प घालण्यात आले असल्याने अपघात घडण्याचे प्रकार सुरू आहेत. काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण होऊन दोन महिने उलटले पण केळकर बागेत जाणाऱया रस्त्यावर रॅम्प घालण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तसेच साईडपटय़ांचे काम देखील अर्धवट आणि निकृ÷ दर्जाचे झाले असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. कॉलेजरोड रस्त्या शेजारी पेव्हर्स घालण्यात आले आहेत. पण सदर काम धर्मवीर संभाजी चौकातील दत्त मंदिर पर्यंत करण्यात आले आहे. त्यापुढील काम रखडले असल्याने किर्लोस्कर रोडकडे जाणारा रस्ता धोकादायक बनला आहे. भरधाव येणारी वाहने रस्त्याकडेला घसरून पडत आहेत. तसेच केळकरबाग तसेच दत्तमंदिरकडे येणाऱया नागरिकांची गैरसोय होत आहे. याठिकाणी रॅम्प करण्याची सूचना स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांना व कंत्राटदाराला करण्यात आली होती. पण याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अनेक वाहनांचे अपघात होत आहेत. केळकरबागेतील रस्त्यावरून दुचाकी वाहनचालकांची वर्दळ जास्त असते. त्यामुळे दुचाकी वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या ठिकाणी रस्ता उंच असल्याने वृद्ध आणि महिला पादचाऱयांना ये-जा करताना अडचण निर्माण होत आहे. अधिकाऱयांकडे सूचना करूनही कानाडोळा केल्याने अखेर नागरिकांनीच या ठिकाणी विटा व सिमेंटचे साहित्य घालून तात्पूरते रॅम्प बनविले आहे. त्यामुळे येथील रस्त्यावर रॅम्प बनविण्यात यावे अशी मागणी होत आहे.