मुख्यमंत्र्यांच्या वाढदिनी उदघाटन ? लोखंडी स्पेन बसवून पुढील कामास प्रारंभ. लवकरच काँक्रीट घालण्यात येणार. जोडरस्त्यांचेही काम जोरात.
डिचोली/प्रतिनिधी
साखळी व मये मतदारसंघांच्या विकासात भर घालणारा आणि एकंदरीत वाहतूक रहदारीला सहकार्य करणाऱया विठ्ठलापूर ते साखळी या अत्यंत महत्वाकांक्षी पुलाचे काम सध्या युध्दपातळीवर सुरू आहे. चालू महिन्याच्या 24 तारखेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा वाढदिवस असल्याने त्यादिवशी या पुलाचे उदघाटन करण्याचा बेत असल्याचे समजते. पुलाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी सध्या या कामावरील मजुरांची संख्या दुपटीने वाढविण्यात आलेली आहे. तर सर्वत्र कामाला जोर देण्यात आलेला आहे.
या पुलासाठी दोन्ही किनारी उभारण्यात आलेल्या काँक्रीट खांबां?वर लोखंडी स्पेन चढविण्यात आलेले आहेत. तर सदर स्पेनवर लोखंडी प्लेट मारण्याचे काम जोरात सुरू आहे. लवकरच म्हणजे येत्या दोन दिवसांनंतर सदर पुलावरील रस्त्याचे प्राथमिक काम हाती घेण्यात येणार आहे. काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले. पूलाला जोडणाऱया विठ्ठलापूर बंदिरवाडा बाजूचा जोडरस्त्यांचेही काम जोरदारपणे सुरू आहे. जोडरस्त्याच्या सर्व बाजूंनी सरंक्षण भिंति उभारण्यात आलेल्या असून मातीचा भराव घालून पुलाच्या पातळीवर रस्ता आणण्यात येणार आहे.
दोन्ही बाजूने जोडरस्त्यांचा विषय निकालात
साखळी बाजारात सदर पुलाचा दुसरा भाग असून बाजाराच्या बाजूने रस्त्याच्या कामासाठीही दोन्ही बाजूंनी संरक्षण भिंती उभारण्यात आलेल्या आहेत. याही ठिकाणी मातीचा भराव टाकून पुलाच्या पातळीपर्यंत सपाटीकरण करण्यात येणार.आहे. बाजारातून या पुलाचा रस्ता जात असल्याने सदर रस्त्याच्या मध्ये येणारे अडथळे दूर करताना किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गाळय़ांचे यापूर्वीच स्थलांतरण करण्यात आले आहे. त्यामुळे पुलापासून बाजारात येणारा रस्ता हा खुला असणार.
बंदिरवाडा विठ्ठलापूर बाजूने पुलाच्या जोडरस्त्या जवळ असलेल्या दुकानांचे त्याच ठिकाणी थोडय़ाशा मागच्या बाजूने स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यासाठीही काम सुरू आहे. मागच्या बाजूला संरक्षण भिंत उभारण्यात आलेली असून सदर भिंतीची कडा धरून दुकाने साकारून देण्यात येणार आहे. आणि सदर रस्त्याला अडथळा ठरणारी दुकाने हटविण्यात येणार असल्याचे समजते. तशी माहिती या प्रकल्पाच्या पर्यवेक्षकांनी माहिती दिली. त्यामुळे बंदिरवाडा विठ्ठलापूर बाजूने जोडरस्त्याचाही प्रश्न मिटणार आहे.
लॉकडाऊनमुळे पुलाच्या लोकार्पणाला विलंब
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कल्पनेतून साखळीच्या विकासात भर घालणाऱया आणि मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताण काही प्रमाणात कमी करणाऱया या पुलाची संकल्पना पुढे आली. या पुलाची पायाभरणी गेल्या 16 फेब्रु. 2020 रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते आमदार प्रवीण झांटय़?, ज्योसुआ डिसोझा, तत्कालीन नगराध्यक्ष धर्मेश सगलानी व इतरांच्या उपस्थितीत घालण्यात आली होती. त्यावेळी या पुलाच्या कंत्राटदाराने येत्या जून (2020) महिन्यातच पुलाचे काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मार्च महिन्यात कोरोनामुळे सर्व लॉकडाऊन झाल्याने त्याचा परिणाम या पुलाच्या कामावर झाला. लॉकडाऊनमुळे या पुलाच्या लोकार्पणाला विलंब झाला. अन्यथा गेल्या चतुर्थीपूर्वीच सदर पुलाचे काम पूर्ण होऊन तो लोकांसाठी खुला झाला असता.
साखळीच्या विकासात नवीन लोकोपयोगी प्रकल्पाची भर
साखळी मतदारसंघ तसेच शहराचा सध्या जोरदारपणे विका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे. या विकासात अनेक प्रकल्प सध्या आकार घेत असतानाच साखळीत वाहनांद्वारे ये जा करणाऱया लोकांसाठी उपयोगी पडणारा असा हा महत्वाकांक्षी पुलाचा प्रकल्प आहे. या पुलामुळे विठ्ठलापूर, बंदिरवाडा, कारापूर तिस्क यासह परिसरातील लोकांना साखळी शहरात किंवा बाजारात येण्यासाठी मुख्य रस्त्यावरून वाहने हाकण्याची गरज भासणार नसल्याने मुख्य रस्त्यावरील स्थानिक लोकांच्या तरी वाहनांचा ताण कमी होणार आहे. असे बाजार परिसराचे नगरसेवक आनंद काणेकर यांनी सांगितले.
साखळीचा विकास योग्य दिशेने (0404ंग्म्5)
साखळीचा विकास सध्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली योग्य दिशेने चालू आहे. टप्प्याटप्प्याने एकेक काम मार्गी लागत आहे. विकासकामात लोकांच्याही सोय गैरसोयीचा विचार करावा लागतो. तो विचार करूनच सध्या साखळीत एक एक प्रकल्प हातावेगळे होत आहेत. या पुलाचा प्रकल्प साकारल्यानंतर लगेच साखळी बाजारातून म्हावळंगतडला जोडणाऱया साकवाचे काम पूर्ण होणार आणि विर्डी ते साखळी हा प्रवास अधिक सुखकर होणार, असे जे. कार्यकर्ते तथा समाजसेवक विनय पांगम यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिनी दोन मोठय़ा प्रकल्पांचे उदघाटन ?
येत्या 24 एप्रिल रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा वाढदिवस असल्याने त्यादिवशी साखळीत दोन मोठय़ा प्रकल्पांचे उदघाटन होणार.असल्याची माहिती मिळाली आहे. विठ्ठलापूर साखळी पुल आणि भव्य साखळी बसस्थानकाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे समजते. या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर.बसस्थानकाचे अजूनही बरेचसे काम अद्याप बाकी आहे. परंतु बसस्थानकावरील बसेसची रहदारी कदाचित सुरू करण्यात येणार असल्याचे समजते.