सातारा / प्रतिनिधी
कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पहाता जेईई, एनईईटी या परीक्षा घेणे योग्य वाटत नाही. याबद्दल विद्यार्थ्यांना अनेक अडचणी आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या निषेधार्थ दि.28रोजी सकाळी 11 वाजता काँग्रेस कमिटीच्यासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुरेश जाधव यांनी दिली.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्राप्त सुचनेनुसार आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सुचनेनुसार दि. 28 रोजी सकाळी 11 वाजता सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भाजप सरकारच्या विरोधात जाहीर निदर्शने करण्यात येणार आहेत,जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव धैर्यशील सुपले यांनी सांगितले.