वार्ताहर / वाठार किरोली
बारा मार्च रोजी आदरणीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जयंतीचे औचित्य साधून खासदार श्रीनिवास पाटील यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार राज्यातील पहिल्या सरपंच सभेचे नियोजन केले होते.
परंतु कोरोना संसर्ग वाढ झालेने जिल्हाधिकारी शेखर सिंग यांची भेट घेऊन परवानगी संदर्भात चर्चा केली. परंतु ५० लोकांची परवानगी असलेने सदरचा नियोजित कार्यक्रम घेता आला नाही. परंतु कोरोना कहर कमी झालेनंतर कार्यक्रम आयोजित केला जाईल अशी माहिती सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी दिली.