जाधव कुटुंबीयांकडून अनोख्या पद्धतीने साकारल्या जाताहेत टोप्या
अमर वांगडे / परळी
सातारा जिल्हा म्हणजे क्रांतीकारी अन् सैनिकी वासरा असलेला जिल्हा. त्याचबरोबर खाद्यपदार्थांमध्ये सातारी कंदी पेढा तर जगविख्यात प्रसिध्द आहे. त्याच बरोबर पुस्तकांचे गाव भिलार, चित्रांचे गाव जकातवाडी यांसारख्या अनेक कलागुणांनी प्रसिध्द असलेला हा सातारा आता नव्या एका उपक्रमाने ओळखला जावू लागला आहे. पांगारे येथील सर्जेराव जाधव व त्यांच्या सौभाग्यवती यांच्या कल्पतेने केवडय़ाच्या पानांच्या टोप्या ह्या साताऱयाची नवी ओळख होवू पाहत आहे.
कोरोना या महामारीने अनेकांची आयुष्य बदलून टाकली असली तरी काहींनी स्वत:च्या हिंमतीवर अन् कल्पनेतून नवनवीन क्षेत्रातून उभारी घेत स्वत:सह इतरांनाही रोजगार निर्मिती करुन दिली. असेच काहीसे उदाहरण म्हणजे पांगारे (ता. सातारा) येथील मूळ रहिवासी सर्जेराव जाधव हे वसई येथे शिलाई गारमेंटमध्ये कार्यरत होते. गेल्या अनेक वर्षांपासून जाधव हे या क्षेत्रात असल्याने ते या कलेत निपुन झाले होते. परंतु कोरानाच्या महामारीत यांच्याही नोकरी व्यवसायाला आर्थिक फटका बसला अन् आर्थिक मार्ग बंद झाल्याने यांनाही आपल्या गावाचा रस्ता धरावा लागला.
सातारा जिल्हय़ातील पांगारे हे गाव तसे दुर्गमच या ठिकाणी भौतीक सुविधांचा वाणवा दिसून येतो. या ठिकाणी प्रामुख्याने शेती व्यवसाय केला जातो. त्यातूनच मार्ग काढत खचून न जाता आपले वडील केवड्य़ाच्या सहाय्याने इरले तयार करायचे याच माध्यमातून काही नवीन करता येत का पाहता पाहता टोपीची संल्पना आल्यावर जाधव कुंटूंबीयांनी ही कल्पना अपार कष्टातून सत्यात उतरवून एक अनोख्या केवडय़ाची टोपी बाजापेठेत आणली.
केवडय़ाची एक टोपी तयार करण्यासाठी केवडय़ाच्या पानांचे काटे काढून जवळपास 5 तास तर 22 ते 26 मीटर लांब वेणीची आवश्यकता असते. गावातील अनेकांनी सर्जेराव जाधव यांच्या कामाचे सुरुवातीला प्रशंसा ही केली. तर कोणी निंदा परंतु कोणतीही तमा न बाळगता ठरवलेले धेय निश्चित करण्याचा जाधव कुटूंबीयांचा मानस होता. तसेच या प्रसंगात पांगारे गावचे माजी सरपंच विठ्ठल पावार यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत होते. थंड आणि सुगंधी अशा केवडय़ाच्या टोप्या ह्या जस जश्या गावांमध्ये दिवसू लागल्या तशी मागणीही दिवसून येत आहे. तसेच मोठी टोपी 300 रुपये तर छोटी कॅप टोपी 200 रुपये अशा अल्पदरात असल्याने अनेकांच्या पसंतीस ही केवडल्याची टोपी उतरत आहे.
मागणी वाढता गावातही होणार रोजगार निर्मिती
केवडय़ाची टोपी हा व्यवसाय घरातील दोघांनी मिळून जरी सुरुवात केली असली तरी या व्यवसायाने व्यापक स्वरुप घेतल्यास गावात रोजगार निर्मिती ही होणार असल्याने पांगारे गाव हे केवडय़ांच्या टोपीचे गाव म्हणून ओळखले जाणार आहे. तसेच या टोप्या 12 तास पाण्यात ठेवल्या असता 4 ते पाच दिवस टोपी थंड राहते यामुळे उन्हात काम करत असताना डोळयांची जळजळ, उन्हाळे यापासून मुक्तता मिळते. केवडय़ाच्या टोप्या तर ह्या सातत्याने तयार होत असून त्यातील काही टोप्या ह्या म्हसवे शेतकरी हॉमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. – सर्जेराव जाधव, पांगारे