सातारा / प्रतिनिधी :
सातारा शहरात मंगळवार तळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर आज दिवसभर पालिकेच्या वतीने अनोखे काम सुरू असल्याचे पाहून सातारकर नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. पावसाचे पाणी रस्त्याच्या कडेला साठते, म्हणून सिमेंटचा कोबा करण्यात येत होता. मुळात गटर बाजूलाच असताना हे काम नेमके कशासाठी केले जात आहे, असा सवाल सातारकर नागरिकांना पडला असून, बांधकाम विभागाने नवीन उपक्रम सातारा शहरात सुरू केल्याची चर्चा सुरू होती.