सातारा / प्रतिनिधी :
सातारा तालुक्यातील संगममाहुली येथे कचरा पेटवल्याने आठ एकर उसाला आग लागली आहे. आगीत सहा शेतकऱ्यांच्या शेतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या बंबाला माहिती दिली आहे.
यामध्ये पांडुरंग पिलाजी शिंदे, जयदीप राजाराम शिंदे, बाळकृष्ण गणपती शिंदे(रा.पाटखळ), संजय विठ्ठल गरुड, दिनकर नामदेव गरुड, संपत मारुती सावंत (रा.संगम माहुली) यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे.