साताऱयाचे तापमान 32 अंश सेल्सिअस ; उन्हाच्या झळांचा जनजीवनावर परिणाम
प्रतिनिधी / सातारा
मार्च महिन्याच्या आरंभापासून थंडी गायब झाली अन उन्हाचा पार चढू लागल्याने सातारचे कमाल तापमानाची 32 अंश सेल्सिअस नोंद झाली आहे तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस आहे. मात्र, सकाळपासून कडक उन्हाच्या झळांचा जनजीवनावर परिणाम होवू लागला असून दुपारी शहरातील रस्ते ओस पडल्याचे दिसू उन्हाळा सुरु होण्याअगोदरच दिसू लागले आहे.
यावर्षी जिल्हय़ात चांगली थंडीही नागरिकांनी अनुभवली आहे. जानेवारीपर्यंत थंडीचा अनुभव नागरिक घेत असताना त्यातच कोरोनाची धास्ती उरावर होतीच. मात्र, जगभरात दुसऱया लाटेची जी चर्चा होती ती दुसरी लाट सातारा जिल्हय़ात आली नाही. त्यामुळे जरा कोठे नागरिक सुटकेचा निश्वास टाकून बेशिस्त होवू पहात असताना फेब्रुवारी महिन्यात कोरोनाने पुन्हा कहर सुरु केला आहे.
वास्तविक थंडीत सर्दी, खोकला, तापाचा सर्वसाधारण त्रास बहुदा सर्वांना होवून जात असतो. मात्र यावर्षी कोरोनाच्या भीतीने सर्दी झाली तरी घरीच काहीतरी उपाय करुन दवाखाना टाळत होते. मात्र, आता लसीकरण सुरु झाले असतानाच दुसरीकडे कडक उन्हाच्या झळाही जाणवू लागल्या आहेत. त्यातच 100 च्या पटीत पेटत असलेला कोरोनाचा वणवाही चटके देत असल्याने अंशतः लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
लॉकडाऊन आणि त्यातच कडक उन्हाळा सुरु झाल्याने सातारा शहरातील रस्ते दुपारी पार ओस पडू लागले आहेत. त्याचा परिणाम बाजारपेठांवरही झाला असून अगोदरच्या कोरोना स्थितीमुळे व्यावसायिक मंदी असताना आता कडक उन्हाळय़ाने मार्केट ओस पडल्याने कोरोना, उन्हाळय़ाच्या दृष्टचक्रात सर्वजण वाटचाल करत आहेत.
थंड पेये घ्यायचीही अडचण
सर्दी, ताप, खोकला आणि कोरोना यांचे नाते जवळचे मानले जात आहे. उन्हाळय़ामुळे फ्रीजमधील थंड पाणी, बाहेरील थंड कोल्ड्रींक्स घ्यायचे म्हटले तरी नागरिक टाळाटाळ करत आहेत. कोरोनाने थंड पेये घ्यायचीही अडचण होवून बसलीय. आईस्क्रीम खाण्याचा आनंद लुटायचा म्हटले तरी ज्यांना थंड खाल्ले लगेच शिंका, सर्दीचा त्रास होतो त्यांनी थंडपेयापासून लांब राहणे पसंद केल्याचे दिसून येत आहे.
व्हायरल इन्फेक्शनचा प्रभाव
एकीकडे कोरोना तर दुसरीकडे कडक उन्हाळा सुरु झाल्याने बदलत्या वातावरणात व्हायरल इन्फेक्शनचा त्रास नागरिकांना जाणवत आहे. सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण दवाखान्यात जात असले तरी दवाखान्यात जाताना मात्र, नागरिक खुप विचार करत आहेत. कारण सर्दी, ताप, खोकल्याला महामारी केल्याची चर्चा नागरिक आता खुलेपणे करु लागलेले आहेत. काहीही असले तरी आता प्रशासन व आरोग्य विभागाने मात्र नागरिकांना दिलासा मिळेल असे वातावरण निर्माण करण्याची गरज व्यक्त होत आहे.