डिलायला लोबोना तिकीट द्यावी की नाही हा निर्णय पक्षेश्रेष्ठी, कोअर कमिटीचा / तिकीट नाकारल्यास पुढील निर्णय घेऊ
प्रतिनिधी /म्हापसा
साळगाव व शिवोली मतदारसंघात डिलायला लोबो या तिकीटसाठी दावा करणार हे खरे आहे. या दोन्ही मतदारसंघात भाजपचे आमदार नाहीत त्यामुळे या मतदारसंघाचा विकास खुंटला आहे. आम्ही म्हापसा, हळदोणा मतदारसंघात दावा केला नाही कारण तेथे भाजपचे उमेदवार आहेत. दावा केलेल्या मतदारसंघात तिकीट द्यावी की नाही हा निर्णय पक्षेश्रेष्ठी, कोअर कमिटी घेणार आहे. तिकीट नाकारल्यास पुढील निर्णय डिलायला घेणार आहेत. भाजपच्या उपाध्यक्षाशिवाय 15 वर्षे सरपंचपद व राजकारणात सक्रिय असल्याने त्यांचा दावा योग्य आहे. या मतदारसंघातून अन्य पक्षाना निवडून आणण्यापेक्षा भाजपला विजयी का करू नये असा प्रतिसवाल मंत्री मायकल लोबो यांनी उपस्थित केला.
डिलायलाला तिकीट द्यावी की नाही हा निर्णय पक्ष, कोअर मकिटीचा
डिलायला लोबो भाजपच्या सदस्या आहेत आणि उपाध्यक्षही आहेत. त्या साळगाव व शिवोलीत तिकीटसाठी दावा करणार आहेत. विविध ठिकाणी पती पत्नी राजकारणात आहेत तर पत्नी समाजकारणात सक्रिय नसती तर दुसरी गोष्ट. डिलायला लोबो 15 वर्षे पंचायतीमध्ये सरपंच म्हणून काम केले आहे. तिने आपला निर्णय घेतला आहे. आपण फक्त तिच्याशी बोललो आहे. मी फक्त म्हटले आहे ती निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. तो निर्णय गावचे लोक घेणार. साळगाव पीळर्ण, बेती, शिवोलीतील नागरिक समाजसेवक आदी येऊन आपल्यास भेटले आहे व त्यांनी तु किंवा डिलायलाला निवडणुकीत बसवा असे स्पष्ट केले आहे. पक्षाचे अध्यक्ष व कोअर कमिटी पुढील निर्णय घेणार.
पक्षामध्ये विचारविनिमय होऊनच पुढील निर्णय
आम्ही फक्त या दोन मतदारसंघात दावा करणार आहोत. भाजपचे उमेदवार नाही तिकडे आम्ही दावा केला आहे. भाजप घराणेशाही करणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. उलट काँग्रेस पक्ष घराणेशाहीला वाव देतात असा आरोप प्रदेशाध्यक्षांनी केलेला अशावेळी तुमची भूमिका काय असेल असे मंत्री लोबो यांना स्पष्ट विचारले असता तुम्ही पक्षाला डच्चू देणार काय? असा प्रश्न लोबो यांना केला असता ते म्हणाले, जेव्हा भाजपने दोघा दोघा आमदारांना घेतलेले आहे ते पती पत्नी आहेत. पुढे खूप जण तिकीट मागणार आहेत. ते समाजसेवेत राजकारणात आहे तर त्यांनी का निवडणुका लढवू नये असा प्रतिसवाल मंत्री लोबो यांनी केला. पक्षामध्ये याबाबत विचारविनिमय होईल त्यानंतरच याबाबत निर्णय होईल असे मंत्री लोबो म्हणाले.
थोडय़ांना आपण आवडत नाही त्याबाबत आपण काहीच करू शकत नाही
मंत्री मायकल लोबो पक्ष सोडणार अशी एकच चर्चा सर्वत्र सुरू आहे, हे कितपत खरे आहे असा प्रश्न लोबो यांना पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले अद्यापतरी तसे काही नाही. पक्षात आपल्याला 1 वर्षे झाली व पक्षाचे काम करून आम्ही पुढे सरलो आहे. निवडणुका जवळ पोचल्या. खूप गोष्टी वर खाली होणार आणि काहीजण करण्याचाही प्रयत्न करणार. जनतेच्या मागणीवर आम्हाला कामे पुढे घेऊन जावेच लागणार आणि ती सुरूच राहणार. ज्या ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या सोडविण्याकडे आम्ही प्रामुख्याने लक्ष देणार आहोत. आपण 2005 साली भाजपचा सोलजर म्हणून या पक्षात रुजू झालो. थोडय़ांना मायकल लोबो आवडत नाही थोडे म्हणतात लोबोना पक्षाची तिकीट देऊ नये. त्यांना आपण काहीच करू शकत नाही. खूप भाषेत चर्चा चालू आहे. आम्ही भाजपचे सदस्य आहोत मात्र काहींच्या पोटात दुखते. मायकलला तिकीट द्यावी की नाही याबद्दल त्यांच्यामध्ये खूप धुसफूस चालू आहे. पक्षाचे अध्यक्ष कोअर कमिटी व केंद्रीय समिती तिकीटाबाबत निर्णय घेणार आहेत. साळगाव, शिवोलीत भाजपचा आमदार नाही. हळदोणा म्हापशात आम्ही दावा केला आहे याबाबत पक्ष निर्णय घेत नाही तर आपली पत्नी डिलायला लोबो पुढील निर्णय घेणार मी नाही असे मंत्री लोबो यांनी स्पष्ट केले. मी काहीच तिच्याबाबत निर्णय घेऊ शकत नाही. गेल्यावेळी साळगावात मनोहर पर्रीकर यांनी डिलायला लोबो यांना निवडणुरीत बसू नका असे सांगितले आपण श्री. परुळेकरांना निवडून आणतो असे सांगितले मात्र त्यांचा पराभव झाला असे मंत्री लोबो म्हणाले.
अन्य पक्षापेक्षा भाजप याठिकाणी का जिंकू नये
आज ती जागा खाली आहे याबाबत पक्ष निर्णय घेणार. आम्ही पक्षाविरोधात काम करीत नाही. आम्ही जागा जिंकून आण्यासाठी दावा करीत आहेत. ती जागा खाली आहे म्हणून अधिकार मागीत आहोत. अन्य कुणी या ठिकाणी जिंकण्यापेक्षा याठिकाणी भाजप का जिंकू नये. गोवा भाजपा व्हिंगच्या त्या उपाध्यक्षा आहेत. तिने या जागासाठी दावा केला आहे. तिकीट दिली नाही तर पुढील निर्णय त्या घेमार असे लोबो यांनी सांगितले.
मुख्यमंत्री कुठे चुकतात ते दाखवून देणे आमचे कर्तव्य आहे
ज्या ज्यावेळी सरकार वा मुख्यमंत्री चुकले आहे ते आम्ही त्यांच्या नजरेस आणून दिले आहे व त्यावेळी कुणाला दिसते तर आपण चूकीचे बोललो आहे तर त्यावर आपण काही करू शकत नाही. गोव्याच्या लोकांच्या हितासाठी आपण बोललो आहे. जेव्हा आमदार म्हणून निवडून येतो तेव्हा आमचे काम प्रश्न उपस्थित करणे कुठे कुठे आम्ही चुकलो ते दाखवून देणे आमचे कर्तव्य आहे. त्यात डॉ. प्रमोद सावंत चांगले कार्य करीत आहेत. व दोन लाखाचे मानधन कोविड रुग्णांसाठी हे चांगले कार्य केले आहे. आणि आम्ही त्यांचे अभिनंदन करतो असे लोबो म्हणाले.
भाजपला किती जागा मिळेल हे येत्या नोव्हेंबरमध्ये स्पष्ट होईल
येत्या निवडणुकीत भाजपचे किती उमेदवार निवडून येऊ शकतात हे फक्त भाजप प्रदेशाध्यक्ष वा मुख्यमंत्रीच तुम्हाला सांगू शकतात. त्यावर आपण भाष्य करू शकत नाही. निवडणूक जाहीर झाल्यावर नोव्हेंबरमध्ये मी किंवा मुख्यमंत्रीही याबाबत स्पष्ट सांगू शकेल. आताच सांगणे हे योग्य ठरणार नाही कारण त्यावेळी उमेदवार कोण असेल हे आताच सांगू शकत नाही. नोव्हेंबर पर्यंत समजणार भाजपचे कोण उमेदवार असणार व कोण विजयी होऊ शकतात. पक्ष कोअर कमिटी वा केंद्रीय समिती उमेदवार जाहीर करणर त्यावेळी 4 महिन्यापूर्वीच स्पष्ट करणार. आम्ही पक्षाचे काम सुरूच ठेवणार. शइवोलीत काम होत नाही.
आमचा आमदार तिथे नाही लोकांना त्याचा त्रास होत होता. मिडीयाने लोकांना नजरेत आणून दिले आहे. वीज, पाणी, रस्ते या तीन गोष्टी आम्ही देऊ शकत नाही तर आमचा काय उपयोग असे ते म्हणाले. वेगवेगळे प्रश्न आहे. पुन्हा पुन्हा रस्ते खोदले जातात. जे काम शिवोली वा साळगाव मतदारसंघात व्हायला पाहिजे ते आपण आपल्या हातात होते ते करणार आहे असे मंत्री लोबो यांनी सांगितले.