चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांच्याशी चर्चा
ऑनलाईन टिम : नवी दिल्ली
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी चर्चा केल्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर म्हणाले की, तीन तास चाललेल्या या चर्चेत दोघांनीही व्यापक आणि ठोस अजेंडा मांडला आहे.
नियंत्रण रेषेवर (एलएसी) झालेल्या अडचणीवर जयशंकर म्हणाले की सामान्य स्थिती पूर्ववत होण्यासाठी शांतता पुनर्संचयित करणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले की, “नियंत्रण रेषेवर सैन्याची उपस्थिती पाहता 1993-96 च्या कराराचे उल्लंघन झाले आहे. य़ावरून चीनसोबतचे संबंध सामान्य नाहीत असेच दिसून येत आहे”
“इतके दिवस खूप मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात आहेत, सीमेवर परिस्थिती सामान्य नाही. आपल्याकडे अजूनही संघर्ष क्षेत्रे सुरू आहेत, तथापि, आम्ही पॅंगॉन्ग, त्सोसह काही संघर्ष क्षेत्रांचा प्रश्न सोडवण्यात प्रगती केली आहे. त्याचाच भाग म्हणून आजची चर्चा होती.”