ऑनलाईन टीम / मुंबई :
आठवडय़ाच्या दुसऱयाच दिवशी शेअर बाजाराने उसळी घेतली आहे. आज सकाळी मुंबई शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 400 अंकांनी उसळला. तर निफ्टीनेही 153 अंकांची कमाई केली.
अमेरिका आणि इराणमध्ये युद्धाचे ढग दाटल्यामुळे काल सेन्सेक्स 787 अंकांनी घसरला होता. रुपयाचे अवमुल्यन झाले होते. मात्र, आज सकाळी सेन्सेक्स 400 अंकांनी उसळला. सध्या तो 41 हजार 200 अंकांवर आहे. तर निफ्टीही 153 अंकानी वधारुन तो 12145 अंकांवर पोहचला आहे.
सध्या एसबीआय, आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक, एनटीपीसी,मारुती, महिंद्रा, रिलायन्स, पॉवरग्रीड या समभागांना सर्वाधिक मागणी आहे.