चेअरमन विश्वास पाटील यांचे प्रतिपादन, गोकुळमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निरोप
प्रतिनिधी / कोल्हापूर
प्रतिकूल परिस्थितीत काम करुन गोकुळला यशाच्या शिखरावर पोहचविण्यात मोलाचा वाटा असणारे कर्मचारी संघाच्या सेवेतुन निवृत्त होत आहेत. याची मनाला खंत वाटत आहे. आज काही कर्मचारी सेवेतून निवृत्त झाले तरी त्यांनी गोकुळसाठी दिलेले योगदान विसरता येणारे नाही. असे भावनिक उद्गार चेअरमन विश्वास पाटील यांनी काढले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले, संघ नियमानुसार कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर सर्वांनाच सेवानिवृत्त व्हावे लागते. अशा कर्मचाऱ्यांच्या कष्टाची जाणीव गोकुळ नेहमीच ठेवेल. कर्मचाऱ्यांनी गोकुळसाठी सुरुवातीच्या काळात अल्प पगारावर कष्टाचे काम केलेले आहे. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी सत्संगाची जोड देऊन उर्वरित आयुष्य घालवावे असे चेअरमन मा. विश्वास पाटील यांनी सांगून, या कर्मचाऱ्यांच्या सेवेचा जरी समारोप झाला असला तरी त्यांनी पुढील आयुष्यामध्ये जास्तीत जास्त वेळ आपल्या परिवारासाठी द्यावा व प्रामाणिकपणे समाधानी जीवन जगावे असे सांगून या सर्वांना दिर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या.
गोकुळ दूध प्रकल्प कार्यस्थळावरील स्व. आनंदराव पाटील-चुयेकर. यांच्या स्मारकाजवळ सत्कार समारंभ पार पडला. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये ज्ञानदेव पाटील, शिवाजी पाटील,जगन्नाथ कांबळे, जगदिश सावर्डेकर, शंकर शिरगांवे, उमेश शेळके, आनंदा मगदूम, आनंदा खोत, तानाजी मगदूम, प्रकाश पाटील, बळवंत परीट, श्रीरग पाटील, पांडूरंग कांबळे, केशव पाटील, सदाशिव खोत, बळवंत पाटील, प्रकाश खोत, साताप्पा चौगले, बसगोंडा पाटील, सुरेश सोलापूरे, चंद्रकांत झिरले, यशवंत पोवार, बंडा मोहिते, पंडीत पाटील, श्रीमती मंगल माने या 25 जणांचा समावेश आहे.
यावेळी संचालक अरुणकुमार डोंगळे, बाबासो चौगले, अभिजीत तायशेटे, नाविद मुश्रीफ, एस. आर. पाटील, चेतन नरके, बयाजी शेळके, अंजना रेडेकर, शशीकांत पाटील, बाळासाहेब खाडे, अजित नरके, संभाजी पाटील, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर आदी उपस्थित होते.