डिचोली/प्रतिनिधी
सेसा वेदांताच्या कामगारांना अर्धा पगार देऊन त्यांची बोळवण केली जात असून हे सर्व कामगार कायद्याच्या विरोधात आहे. या कामगारांना कामावर ठेवून बेकार ठेवले जात असून कोंडली व इतर ठिकाणाहून येथून कामगार आणून काम करून घेतले जात आहे. कामगारांना कसलीही सुविधा न देता त्यांची बोळवण केली जात असल्याची टीका कामगार संघटनेचे कायदा सल्लागार अजय प्रभुगावकर यांनी केली असून याबाबत सेसा कंपनी व्यवस्थापन व मजूर आयुक्त व संबंधित मंत्र्यां?ना पत्र पाठवून कामगारांचे हित जपावे, अशी मागणी केली आहे. अशी माहिती अजय प्रभुगावकर यांनी दिली
प्रभुगावकर यांनी कामगारांना कसलीही सुविधा दिली जात नाही, त्याना येण्या जण्यासाठी वाहतूक सुविधा नाही, तसेच तिसऱया शिफ्टसाठी कसली सुविधा पुरवली जात नाही, रात्रीच्यावेळी काम करताना ज्या आवश्यक सुविधा पुरवणे अपेक्षित आहेत त्या पुरवल्या जात नाहीत, कामगारावर खूपच अन्याय केल्याची भावना दिसून येत आहे असे सांगितले.
आवश्यक सुविधा पुरवल्या जात नसल्याने कामगारांनी रात्र पाळीत काम करण्यास नकार दिला असून या बाबत वारंवार व्यवस्थापनाशी बोलणी करण्याची मागणी केली असता सतत याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या विविध माध्यमातून कामगारांची पिळवणूक केली जात असून व्यवस्थापनाने तातडीने हे सर्व प्रकार त्वरित थांबवावेत नपेक्षा पुन्हा शांततेने आंदोलन करून आवाज उठवण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगण्यात आले.
कामगार नेते निलेश कारबोटकर, किशोर लोकरे यांनी हे पात्र व्यवस्थपनाला दिले असून या बाबत कंपनीने दखल घ्यावी अशी मागणी अजय प्रभुगावक यांनी केली आहे.
दरम्यान सध्या कामगारांची अवस्था दयनीय झाली असून सरकारने अजूनही आपले धोरण स्पष्ट न केल्याने कामगार वर्ग संकटात सापडला आहे. डिचोली तालुक्मयातील खनिज माल नेवून सरकारने मडगाव, पणजी शहरांचा विकास साधला असून डिचोलीला कसल्याच सुविधा मिळालेल्या नाहीत यावर. प्रभुगावकर यांनी टीका केली. या बाबत कामगार मजूर आयुक्त तसेच संबंधित मंत्री यांनाही पत्राद्वारे कल्पना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान कंपनी व्यवस्थापनाने कामगारांचे हित जपले नाही तर हे प्रकरण चिघळण्याची शक्मयता असून कामगार वर्ग निराश होत असून त्याना तातडीने दिलासा देण्यासाठी सरकारने मध्यस्थी करण्याची गरज आहे. असेही त्यांनी पुढे म्हटले.