तिघा जणांचा मृत्यू, 44 रुग्ण कोरोनामुक्त
प्रतिनिधी /बेळगाव
सरकारने लॉकडाऊन शिथिल केला आहे. सोमवारपासून रात्री 9 पर्यंत व्यवहार सुरू ठेवण्यात आले आहेत. रुग्णसंख्या घटत चालल्यामुळे लॉकडाऊन उठविण्यात आला असला तरी सोमवारी जिल्हय़ातील आणखी 95 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर महिलेसह तिघा जणांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या 24 तासात 44 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी जाऊ देण्यात आले आहे. एकूण बाधितांचा आकडा 76 हजार 247 वर पोहोचला आहे. त्यापैकी 73,669 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. अद्याप 1,781 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळी इस्पितळे व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
चिकोडी तालुक्मयातील दोन वृद्ध व बेळगाव तालुक्मयातील एका महिलेचा मृतात समावेश आहे. मृतांचा सरकारी आकडा 797 वर पोहोचला आहे. बेळगाव, अथणी, चिकोडी तालुक्मयात रुग्णसंख्या वाढतच आहे. सौंदत्ती, गोकाक, रायबाग, रामदुर्ग तालुक्मयात सोमवारी एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. खानापूर व हुक्केरी तालुक्मयात प्रत्येकी 1 व बैलहोंगल तालुक्मयात दोघा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्हय़ातील 1 हजार 302 जणांचे अहवाल अद्याप यायचे आहेत. आतापर्यंत 9 लाख 69 हजार 914 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 8 लाख 88 हजार 88 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोमवारी राकसकोप येथील एका कुटुंबातील तिघा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आझमनगर, गांधीनगर, राणी चन्नम्मानगर, संभाजी गल्ली, सोमवार पेठ-टिळकवाडी परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.