प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यात शनिवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावली असून एकाच दिवशी 24 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धो धो पावसामुळे बळीराजा चांगला सुखावला आहे. जिह्यात आतापर्यंत 92.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान सर्वाधिक पाऊस माढा तालुक्मयात 39.7 मिमी पाऊस पडला आहे. यामुळे खरीप पेरण्या सुरू होण्यास मदत होणार असल्याची माहिती कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी दिली.
बऱयाच दिवसांच्या विश्रांतीनतर सोलापूर शहर जिह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. धो धो पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. शनिवारी रात्री आणि रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. सोलापूर जिह्यातील खरीप हंगामातील पिकांच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली असून यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, तूर व सूर्यफूल पिकांचा समावेश आहे. सोयाबीन, उडीद पेरणीस काही भागात सुरुवात झाली आहे. या झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना चांगले आहे. उत्तर सोलापूर 34.0, दक्षिण सोलापूर 25.8, बार्शी 12.6, अक्कलकोट 13.3, मोहोळ 38.7, माढा 39.7, करमाळा 34.4, पंढरपूर 28.8, सांगोला 13.3, माळशिरस 10.0, मंगळवेढा 20.5 एकूण सरासरी 23.7 पाऊस झाला आहे.