वैराग / प्रतिनिधी
वैराग भागात सध्या राजरोसपणे मटका ,जुगारसह अनेक अवैध्य व्यवसाय पोलिसांच्या आशीर्वादाने चालू असून याबाबत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार संघटना जिल्हा अध्यक्ष संजीवनी बारंगुळे यांनी दिला आहे. याबाबत अधिक वृत्त असे की वैराग पोलिस ठाणे अंतर्गत ५७ गावे येतात, या गावातील नागरिकांचा व वैरागशी दररोज विविध कारणाने संबध येतो. वैरागच्या बसस्थानकासमोरच्या परिसरात अनेक टपऱ्यांमधून राजरोसपणे कल्याण, मुंबई मटक्याचे व जुगाराचे अवैध व्यवसाय सुरू आहेत. वैराग पोलिसांकडून कोरोना महामारीच्या काळात या अवैद्य व्यवसायाकडे डोळेझाक केली जात असल्याने सर्वसामान्यांतून संताप व्यक्त होत आहे